शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नागपुरात पहिल्याच दिवशी मिळाला एसटीला ‘रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:35 IST

कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्र्यालयाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. एका बसमध्ये ४४ च्या वर प्रवासी बसले.

ठळक मुद्दे प्रवाशांनी केली गर्दी : एका बसमध्ये बसले ४४ वर प्रवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्र्यालयाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. एका बसमध्ये ४४ च्या वर प्रवासी बसले. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतुकीस सुरुवात केली. त्यानंतर खासगी वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीने प्रवासी वाहतुकीस सुरुवात केली. त्यानुसार केवळ २२ प्रवाशांची वाहतूक सुरू होती. काही दिवस एसटीला नुकसान सोसावे लागले. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सकाळपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश मार्गावरील बसेसमध्ये ४४ प्रवासी बसले. ४४ प्रवाशांशिवाय ११ प्रवाशांना बसमध्ये उभे राहण्याचे परवानगी असते. परंतु एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून नागपुरातील चालक-वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्यामुळे असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.पहिल्याच दिवशी प्रतिसाद‘पुर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश मिळाल्यानंतर आम्ही बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार एसटीला चांगले उत्पन्न होईल.’अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगारवाहकांना सुरक्षा पुरवावीएसटी बसेस पुर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय आहे. परंतु त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. वाहकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर पुरविण्याची गरज आहे.’अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटनावाहकांना सॅनिटायझर, मास्क द्यावेत‘ पुर्ण क्षमतेने बसेस सुरु करण्याचा निर्णय चांगला आहे. बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात यावे.’शालीनी जामनीक, वाहक, नागपूर

टॅग्स :state transportएसटीnagpurनागपूर