शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एसटी महामंडळ शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सोडणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

नागपूर : आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नागपुरात ...

नागपूर : आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नागपुरात येतात. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे.

ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी येतात. परंतु अनेक मार्गावर एसटीच्या बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. एसटीचा पास काढून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. परंतु त्यांच्या मार्गावर बस नसल्यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परंतु एखाद्या मार्गावर २० विद्यार्थी मिळाल्यास आणि संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी मागणी केल्यास एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही भर पडणार असून विद्यार्थ्यांनाही सुविधा मिळणार आहे. मागणी केल्यानंतर त्वरित या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या एसटीची ७० टक्के वाहतूक सुरू आहे. एसटीच्या ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळाल्यास या बसेसही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

.............