श्रीशक्तिपीठातर्फे दासनवमी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:43+5:302021-03-04T04:11:43+5:30
नागपूर : श्रीदासनवमीनित्त श्रीशक्तिपीठातर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिवम शेखर दिवाळे या विद्यार्थ्याने ...

श्रीशक्तिपीठातर्फे दासनवमी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
नागपूर : श्रीदासनवमीनित्त श्रीशक्तिपीठातर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिवम शेखर दिवाळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अकोला येथील अवंती पाठक व नागपुरातील सिमरन बोरीकर यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आला आहे.
मोठ्या वयोगटात यवतमाळ येथील जयश्री तांबुळे व नागपुरातील प्रतिभा सेनाड यांचा प्रथम क्रमांक आला आहे. नागपुरातील भाग्यश्री जोशी व अलकनंदा झाडे यांचा द्वितीय तर नागपुरातील वंदना नातू व पुण्यातील आश्लेषा भागवत यांचा तृतीय क्रमांक आला आहे. गोंदिया येथील पुष्पलता सहस्रबुद्धे व नागपुरातील वैजयंती गोखले व संगीता वाईकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित झाला आहे. सुंदर अक्षर स्पर्धेत नागपुरातील यामिनी पांडे व वर्षा देशपांडे तर विशेष पुरस्कारासाठी अभ्युदय काशीकर, मीनाक्षी वऱ्हाडपांडे व शैलजा सराफ यांची निवड झाली.