शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धानाच्या नवीन संशोधित वाणाला आत्माचे प्रोत्साहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:08 IST

आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

ठळक मुद्देपार्वतीसुत सुगंधित व लहान तांदळाचे वाण : प्रायोगिक तत्त्वावर २०० एकरात भाताची रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्र्रीय पद्धतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्या प्रमाणात झाले. प्रायोगिक पध्दतीने २० हेक्टरवर १३६० क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी ७० रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले. जिल्ह्यातील मौदा, उमरेड, कुही, रामटेक, पारशिवनी आदी भात उत्पादक क्षेत्रात रोवणीसाठी हे धान उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तथा गट स्थापन करुन पार्वतीसुत या नवीन संशोधित वाणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.चंद्रपूरच्या शेतकऱ्यांने विकसित केले वाणहलका सुगंधित व बारीक असलेले पार्वतीसुत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वतीसुत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर उत्पादनाला सुरुवात केली.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर