शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या नवीन संशोधित वाणाला आत्माचे प्रोत्साहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:08 IST

आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

ठळक मुद्देपार्वतीसुत सुगंधित व लहान तांदळाचे वाण : प्रायोगिक तत्त्वावर २०० एकरात भाताची रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्र्रीय पद्धतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्या प्रमाणात झाले. प्रायोगिक पध्दतीने २० हेक्टरवर १३६० क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी ७० रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले. जिल्ह्यातील मौदा, उमरेड, कुही, रामटेक, पारशिवनी आदी भात उत्पादक क्षेत्रात रोवणीसाठी हे धान उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तथा गट स्थापन करुन पार्वतीसुत या नवीन संशोधित वाणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.चंद्रपूरच्या शेतकऱ्यांने विकसित केले वाणहलका सुगंधित व बारीक असलेले पार्वतीसुत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वतीसुत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर उत्पादनाला सुरुवात केली.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर