शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धानाच्या नवीन संशोधित वाणाला आत्माचे प्रोत्साहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:08 IST

आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

ठळक मुद्देपार्वतीसुत सुगंधित व लहान तांदळाचे वाण : प्रायोगिक तत्त्वावर २०० एकरात भाताची रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्र्रीय पद्धतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्या प्रमाणात झाले. प्रायोगिक पध्दतीने २० हेक्टरवर १३६० क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी ७० रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले. जिल्ह्यातील मौदा, उमरेड, कुही, रामटेक, पारशिवनी आदी भात उत्पादक क्षेत्रात रोवणीसाठी हे धान उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तथा गट स्थापन करुन पार्वतीसुत या नवीन संशोधित वाणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.चंद्रपूरच्या शेतकऱ्यांने विकसित केले वाणहलका सुगंधित व बारीक असलेले पार्वतीसुत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वतीसुत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर उत्पादनाला सुरुवात केली.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर