शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नाट्य प्रशिक्षण संस्थांतील आत्माच हरविलेला : सुरेश शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:20 IST

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुरेश शर्मा यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे संगीत, नृत्याप्रमाणेच नाटकही अभ्यासाचा विषय व्हावारविवारी होणार ‘भारत रंग नाट्य महोत्सवा’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगाल आणि महाराष्ट्राप्रमाणे उत्तर भारतात हिंदी रंगभूमी विकसित झालेली नाही. मात्र, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुरेश शर्मा यांनी व्यक्त केल्या.एनएसडीच्या २१व्या भारत रंग नाट्य महोत्सवाचे नागपुरातील उद्घाटन रविवारी ९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शंकरनगरातील साई सभागृहात होत आहे. त्याअनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत शर्मा बोलत होते. याप्रसंगी एनएसडीचे तज्ज्ञ सदस्य डॉ. विनोद इंदूरकर व डॉ. राजन उपस्थित होते.नाट्य प्रशिक्षण संस्थांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रात्यक्षिकांचे धडे देणे गरजेचे आहे. नाटक हे पुस्तकी नव्हे तर प्रायोगिक असते. त्याचाच अभाव दिसून येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या प्रशिक्षण संस्थांमधून विद्यार्थी तयार होत आहेत. मात्र, ते विकसित नसल्याने, त्यांची मागणी वाढत नाही. म्हणूनच, शाळांमध्ये नाटक हा अभ्यासाचा विषय व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा अभ्यासक्रमही निर्धारित करण्यात येत आहे. गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले, जिथे नाटक हा शाळांमध्ये अभ्यासाचा विषय म्हणून स्वीकारण्यात आल्याचे प्रो. सुरेश शर्मा यावेळी म्हणाले. एनएसडीतर्फे लवकरच नाट्यलेखनविषयक उपक्रम एफटीआयच्या सहयोगाने सुरू करणार आहोत. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ देशविदेशातील नाटके सादर होणार असून, वातावरणनिर्मितकरिता नागपुरातील रंगकर्मींकडून दररोज २० मिनिटांची लघुनाटके सादर होणार असल्याचेही शर्मा म्हणाले.

टॅग्स :NatakनाटकMediaमाध्यमेnagpurनागपूर