शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हवी विशेष कायद्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:20 IST

एकनाथ शिंदे यांच्या गडचिरोली दौऱ्यात पोलीस अधिकाऱ्यांची मागणी

नागपूर : नक्षलवाद्यांवर अंकुश प्रस्थापित करण्यासाठी छत्तीसगड राज्याने स्पेशल पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅक्ट लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा लागू झाला तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील क्षेत्रात पोलिसांना अधिक प्रभावी पद्धतीने काम करता येईल, असे मत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडचिरोली दौºयादरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दुसºयाच दिवशी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. गृहमंत्र्यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर गोडलवाही या नक्षलग्रस्त भागातील आऊटपोस्टला भेट देत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपी या विभागांतील अधिकाºयांशी झालेल्या चर्चेदरम्यान छत्तीसगडमध्ये लागू असलेल्या या कायद्याचा ऊहापोह झाला. याबाबत राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता छत्तीसगडच्या कायद्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, त्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या कायद्याच्या परिणामांची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. ती घेतल्यानंतरच मला याबाबतची स्पष्ट भूमिका मांडून पुढील दिशा ठरवता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गडचिरोली पोलिसांचे प्रलंबित प्रस्ताव आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी गृहविभागाच्या अधिकाºयांची एक बैठक लवकरच बोलावणार असून त्यात या कायद्याबाबतची मते जाणून घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.नक्षलवादाचा बीमोड; आदिवासींचा विकासनक्षलवाद्यांच्या दहशतीचा बीमोड करून या भागातल्या जनतेची सामाजिक आणि आर्थिक प्रगती करून समाजाच्या मु्ख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा शब्द यावेळी गृहमंत्र्यांनी बैठकीत दिला. पोलीस भरतीपासून अन्य प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मंत्रिमंडळात त्याबाबतचे निर्णय तातडीने घेतले जातील. उद्योगांना चालना, आधुनिक शेतीसाठी प्रयत्न, आदिवासी मुलांना शहरांमध्ये प्रगत शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी अशा अनेक आघाड्यांवर काम करावे लागेल. लोकांच्या हाताला काम मिळाले की नक्षलवादाचा प्रभाव नक्की कमी होईल, अशा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर