दु:ख, अपमान, मनस्ताप अन् आक्रोश..
By Admin | Updated: May 13, 2014 00:59 IST2014-05-13T00:59:13+5:302014-05-13T00:59:13+5:30
मृत्यूच्या जबड्यात वावरणार्या जवानांच्या नातेवाईकांना कशी वर्तणूक मिळावी? आपुलकीची! होय, या बिचार्या हवालदिल जीवांना आता आपुलकीचीच नितांत आवश्यकता आहे

दु:ख, अपमान, मनस्ताप अन् आक्रोश..
संतप्त नातेवाईकांचा सवाल : प्रशासनाविषयी नाराजी नरेश डोंगरे - नागपूर मृत्यूच्या जबड्यात वावरणार्या जवानांच्या नातेवाईकांना कशी वर्तणूक मिळावी? आपुलकीची! होय, या बिचार्या हवालदिल जीवांना आता आपुलकीचीच नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्यांना आज सकाळपासून नागपुरात अपमानास्पद अन् तिटकार्याची वर्तणूक मिळाली. आज रात्री त्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी थेट सवाल केला, कशासाठी करता हा तमाशा? गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी झालेल्या हेमंत बन्सोडे (३0) आणि पंकज सिडाम (२९) या जवानांना येथील ऑरेंजसिटी ईस्पितळात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापत झाल्यामुळे बन्सोडे कोमात गेले. डॉक्टरांनी बन्सोडे यांच्यावर ‘ट्रफीऑक्टॉमी’ची शस्त्रक्रिया (श्वसन नलिकेत छिद्र) केली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ‘लोटस् हॉटेल’मध्ये केली. रविवारच्या रात्रीचे कसेबसे भागले. आज दुपारचे जेवण घ्यायला गेलेल्या नातेवाईकांना पैशाची मागणी करण्यात आली. एवढय़ा दुरून घाईगडबडीत आलेल्या या बिचार्यांजवळ पैसे कुठून असणार? सिडाम यांच्या डोक्याला, हाताला, कानाला आणि शरीराच्या अन्य भागांना स्फोटामुळे गंभीर जखमा आहेत. प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांना अतिदक्षतेत प्रदीर्घ उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टर सांगतात. या दोघांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला आहे. जखमींना तर पोलिसांनी हेलिकॉप्टरने नागपुरात आणले. मात्र, त्यांचे नातेवाईक मिळेल ते वाहन पकडून दिवसभराचा प्रवास करून नागपुरात आले. इस्पितळाची शोधाशोध करीत ऑरेंजसिटीत पोहोचले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था गडचिरोली पोलिसांतर्फे करण्याचे ठरले होते. मात्र, स्फोटातील मृतदेह पाहून स्थानिक संपर्क अधिकारी (गडचिरोली लायझनिंग ऑफिसर) बेशुद्ध पडले. घाईगडबडीमुळे दुसरा संपर्क अधिकारी येथे येऊ शकला नाही. परिणामी मोठा घोळ झाला. स्थानिक (नागपूर) पोलिसांनी बन्सोडे आणि सिडामच्या नातेवाईकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ऑरेंजसिटी समोरच्या आपला माणूस असा मृत्यूच्या जबड्यात फसला असताना कशाला जेवणासाठी कुरबूर करायची, असा प्रश्न स्वत:च स्वत:ला करून या बिचार्यांनी रखरखत्या उन्हात तोंडाचे पाणी गिळत दिवस काढला. रात्री ७.४५ ला गृहमंत्री आर. आर. पाटील इस्पितळात आले. पोलीस अधिकारी, पत्रकार आणि काही नेते, कार्यकर्त्यांचाही गर्दी झाली. तब्बल ४0 ते ५0 मिनिटे त्यांची धावपळ चालली. इस्पितळाच्या व्हरांड्यातच असलेल्या या नातेवाईकांची विचारपूस करण्याचे कुणी सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्यांचा रोष उफाळून आला. कशासाठी हा तमाशा करता, असा सवाल करीत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करू, असे परवलीचे वाक्य त्यांनी काही वेळेपूर्वीच ऐकले होते. त्यामुळे मृत्यूच्या दारात लोटण्यापूर्वीच का नाही सुरक्षेच्या उपाययोजना करत, असा सवाल त्यांनी केला. सर्व व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था आहे, असे सांगतात. आमच्या नातेवाईकांनी यांच्यासाठी जीव टाकायचा, त्यांनी मात्र आमची साधे अंग टाकायचीही व्यवस्था नाही करायची, असे म्हणत सर्वच एकसाथ बोलते झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने चौकशी केली असता, त्यांनी एकदमच आपली कैफियत मांडली. बन्सोडे मृत्यूच्या विक्राळ जबड्यात फसल्यामुळे त्याची अडीच महिन्याची गरोदर पत्नी वेड्यागत झाली आहे. वारंवार बेशुद्ध पडत आहे. त्याचा भाऊ अपंग आहे. वृद्ध आई-वडिलही कमालीचे चिंतातूर आहेत. ही मंडळी नागपुरात आली. त्यांच्यासोबत त्यांना धीर द्यायला गडचिरोली जिल्ह्यातील त्यांचे रक्ताचे नातेवाईक आले. आज सकाळपासून त्यांना साधे जेवणही मिळाले नाही. पैसे आणा, तेव्हा जेवण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले आहे. सिडामच्या नातेवाईकांचेही असेच आहे.