शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 10:02 IST

नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्री फुंडकर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोंडअळी संदर्भातील आदेश चुकीचा काढण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात नागपूर जिल्ह्यातील सन २०१७-१८ कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजनाचा आढावा कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेबर बावनकुळे, डॉ. आशिष देशमुख, सुधीर पारवे, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सादरीकरण केले.फूंडकर म्हणाले, बीटी कापसावर मागील खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापला. त्यानंतर शासनाने मदत देण्याचे जाहीर केले होते. कृषी व महसूल यंत्रणेकडून संयुक्त सर्वेक्षणही करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील ८ तालुक्यात १ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या ६९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र यात नागपूर जिल्ह्यातील मौदा, काटोल,नरखेड, रामटेक आणि कळमेश्वर या पाच तालुक्यात नुकसान झाले नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. कृषिमंत्री पांडुरंग फुं डकर यांनी रविवारी खरीप हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बीटी कापसासंदर्भात यंदा ठोस पावले उचलण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहे. बोंडअळी संदर्भातील मदतीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. यानुसार वगळण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निधी देण्यास उशीर झाला असला तरी लवकरात लवकर तो शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध करून द्यामागील वर्षाच्या तुलनेत सरासरी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्यामुळे शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीककर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश फुंडकर यांनी दिले.

जमीन आरोग्यपत्रिका वितरित कराखरीप हंगामाचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात कृषी सहायक व कृषितज्ञ यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करुन पीकपद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु केलेला उपक्रम विदर्भातील सर्व जिल्ह्यात १ मे ते ३० मे पर्यंत राबविण्याच्या सूचना कृषिमंत्री फुंडकर यांनी केल्या.

बोगस बियाण्यांबाबत सतर्क राहानिकृष्ट व बोगस बियाणासंदर्भात सतर्क राहून अशा बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर भरारी पथके सज्ज ठेवा. ग्रामसभेत सुद्धा अशा बियाणापासून सतर्क राहण्याचा सूचना प्रत्येक शेतकऱ्यांना करा. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली निकृष्ट बीटी बियाणे तसेच इतर बियाणे अथवा खरीप हंगामाबाबत अडचणी असल्यास त्याची माहिती जिल्हास्तरावर तात्काळ दखल घेऊन सोडविण्यात याव्यात, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.असे आहे खरीपचे नियोजननागपूर जिल्ह्यात पीक लागवडीखाली ५ लक्ष ९३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ९१ हजार ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४ लाख ८० हजार ७५६ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी तर १ लाख ६४ हजार ५७२ हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामाखाली आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत ७८.९१ टक्के पाऊस पडल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.खरीप हंगामामध्ये खरीप भात ९४ हजार २०० हेक्टर, खरीप ज्वारी ८ हजार हेक्टर, तूर ६ हजार ५०० हेक्टर, सोयाबिन १ लाख हेक्टर तर कापूस २२ हजार ५०० हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीन व कापसाच्या क्षेत्रात थोड्या प्रमाणात घट आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे महाबीजकडुन २९५४२ क्विंटल तर खासगी कंपन्यांनकडून ५६६६२ क्विंटल असे एकूण ८६२०४ क्विंटल उपलब्ध होणार आहे.यामध्ये सोयाबीन-५६२५० क्विंटल, भात १८८४० क्विंटल, कापूस ५०६३ क्विंटल, तूर ३१२० क्विंटल, भुईमुंग १०८९ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्यानुसार बियाणे उपलब्ध आहेत. तसेच १ लाख ४१ हजार ७४० मेट्रिक टन खतांची आवश्यकता असून त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर