शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुणाला रोकड, तर कुणाला मिळाला लॅपटॉप परत

By नरेश डोंगरे | Updated: December 3, 2024 19:08 IST

नागपूर, वर्धा आणि बैतुलमधील घटना : आरपीएफचे ‘ऑपरेशन अमानत’

नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रोकड असो अथवा कोणती किमती चिजवस्तू एकदा चोरीला गेली किंवा गहाळ झाली तर ती परत मिळणे कठीण मानले जाते. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या हरिवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या चीजवस्तू आणि रोकड शोधून परत करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांचा छडा लावून आरपीएफने रोख रक्कम आणि किंमती चिजवस्तू ज्यांच्या त्यांना परत केल्या.

दोन घटना नागपूर रेल्वे स्थानकावरच्या आहेत. आरपीएफला वेगवेगळ्या दोन बॅग आढळल्या. एका बॅगमध्ये डेल कंपनीचा ३५ हजार किंमतीचा लॅपटॉप होता आणि दुसऱ्या बॅगमध्ये टॅब, रोख रक्कम आणि अन्य चिजवस्तू असा एकूण १७,५०० रुपयांचा मुद्देमाल होता. आरपीएफने त्या दोन्ही बॅगमधील चिजवस्तूंवरून संबंधित व्यक्तींची ओळख पटविली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या चिजवस्तू परत केल्या. वर्धा रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स गहाळ झाली. त्यात १५०० रुपये आणि मोबाईल होता. वर्धेवरून जाणाऱ्या एका ट्रेनमधून एका व्यक्तीची बॅग लंपास झाली. ज्यात १ लाख रुपये किमतीचा लॅपटॉप होता. या दोघांचीही आरपीएफने माहिती मिळवून त्यांना संपर्क केला आणि त्यांचे साहित्य त्यांना परत केले.

अशाच प्रकारे बैतुल स्थानकावरही एका प्रवाशाची पाच हजारांचे साहित्य असलेली बॅग शोधून आरपीएफने त्या व्यक्तीला ती परत केली. या सर्व घटनांमधील मुद्देमालाची किंमत एक लाख, ५८ हजार रुपये आहे.

प्रवासी झाले गदगद

चोरीला गेलेल्या, गहाळ झालेल्या किंमती चिजवस्तू आणि रोख रक्कम आरपीएफने परत मिळवून दिल्याने संबंधित प्रवाशी गदगद झाले आहेत. त्यांनी आरपीएफच्या कर्तव्यदक्षतेची प्रशंसा चालविली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर