शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

काही मंत्री स्वत:ला 'सुपर सीएम' समजतात : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 21:35 IST

Devendra Fadnavis मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर राज्यात झालेल्या गोंधळावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देसत्तेतील पक्षांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर राज्यात झालेल्या गोंधळावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी शासनातील काही मंत्री स्वत:ला सुपर सीएम समजतात. हे मंत्री कुठलीही घोषणा करतात व मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धोरणात्मक निर्णयांची घोषणा सर्वसाधारणत: मुख्यमंत्रीच करतात. जर त्यांना शक्य नसेल तर त्यासाठी कुठल्या तरी मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. संबंधित मंत्री शासनाच्या अनुषंगाने वक्तव्य देतात. मात्र महाराष्ट्रात एकाच विषयावर पाच पाच मंत्री वक्तव्य देत आहेत. घोषणा करून देतात व त्यानंतर यावर मुख्यमंत्री बोलतील असेदेखील सांगतात. हा सर्व प्रकार श्रेय घेण्यासाठी होत आहे. परंतु मंत्र्यांनी श्रेय घेण्याअगोदर काही कामदेखील केले पाहिजे. लहान व मध्यम व्यापारी निर्बंधांमुळे नाराज आहेत, अशा स्थितीत सरकार संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.

संभाजीराजेंवर टीका करण्याची गरज नाही

खा.संभाजीराजेंवर भाजपच्या नेत्यांकडून टीका होत असल्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी भाष्य केले. संभाजीराजेंवर टीका करण्याचे कुठलेही कारण नाही. त्यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या बाजूची भूमिका मांडली आहे. सगळ्यांनी एकत्रित यावे ही त्यांची भूमिका अजिबात चुकीची नाही. आम्ही तर तयार आहोत, मात्र समोरच्यांनी राजकारण करू नये. संभाजी राजेंबाबत जाणीपूर्वक काही गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नारायण राणे नेमके काय बोलले याची कल्पना नाही. पण त्यांच्याशी निश्चित चर्चा करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकार कारणे देत आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी व मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्य शासन केवळ कारणे देत आहे. १३ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आता राज्य शासनाने मागासवर्गीय आयोग गठित केला आहे. लेटलतिफीमुळे आरक्षण संपले. सरकारला मराठा आरक्षण देण्याची कुठलीच इच्छा नाही, असेदेखील फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण