शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

नागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:43 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जि.प.ची. नावीन्यपूर्ण योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचे चटके ग्रामीणांना सोसावे लागताहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने कामे हाती घेतले आहे. परंतु, १२० फुटाखाली पाणी गेल्यानंतर त्याचा वापर होत नाही. त्याच पाण्याचा वापर करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता नीलेश मानकर यांनी अभिनव योजना तयार केली आहे. २००० लीटरची टाकी उभारून त्यात अर्धा एचपीचा सौरपंप जोडला जाईल. त्या टाकीतील पाण्याचा वापर नागरिकांना करता येईल.ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारण्यासाठी बोअरवेल्स उभारून हॅण्डपंप लावला जातो. मात्र १२० फुटापर्यंत पाणी वरती ओढता येते. त्यामुळे त्याखालील पाण्याचा वापर साधारणत: होत नाही. ते पाणी वापराकरिता आणण्यासाठीच ही योजना आहे. त्या ठिकाणाहून गरजेनुसार नागरिक पाणी वापरतील. सौरपंपामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल. विशेष म्हणजे शासनाला नव्याने बोअरवेल उभारण्याची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांना पाठविणार प्रस्तावजिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनची बैठक जि.प.अध्यक्षा निशा सावकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी पार पडली. याप्रसंगी मानकर यांनी या योजनेची माहिती सदस्यांना दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला जाणार असून एक प्रात्याक्षिकही दाखविले जाईल. तसेच पाणी टंचाई भाग-१ अंतर्गत ४८२ विंधन विहिरीचा आराखडा मंजुरीकरिता जिल्हाधिकाºयांना पाठविला. १६७९ हॅण्डपंपपैकी लोकसंख्येनिहाय १०८८ हॅण्डपंपाकरिता स्थळ निश्चित केले आहे. त्यापैकी २१७ हॅण्डपंपची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, विषय सभापती उकेश चव्हाण, सभापती पुष्पा वाघाडे, सभापती दीपक गेडाम, सदस्य जयप्रकाश वर्मा, डॉ. शिवाजी सोनसरे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी