शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:43 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जि.प.ची. नावीन्यपूर्ण योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचे चटके ग्रामीणांना सोसावे लागताहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने कामे हाती घेतले आहे. परंतु, १२० फुटाखाली पाणी गेल्यानंतर त्याचा वापर होत नाही. त्याच पाण्याचा वापर करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता नीलेश मानकर यांनी अभिनव योजना तयार केली आहे. २००० लीटरची टाकी उभारून त्यात अर्धा एचपीचा सौरपंप जोडला जाईल. त्या टाकीतील पाण्याचा वापर नागरिकांना करता येईल.ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारण्यासाठी बोअरवेल्स उभारून हॅण्डपंप लावला जातो. मात्र १२० फुटापर्यंत पाणी वरती ओढता येते. त्यामुळे त्याखालील पाण्याचा वापर साधारणत: होत नाही. ते पाणी वापराकरिता आणण्यासाठीच ही योजना आहे. त्या ठिकाणाहून गरजेनुसार नागरिक पाणी वापरतील. सौरपंपामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल. विशेष म्हणजे शासनाला नव्याने बोअरवेल उभारण्याची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांना पाठविणार प्रस्तावजिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनची बैठक जि.प.अध्यक्षा निशा सावकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी पार पडली. याप्रसंगी मानकर यांनी या योजनेची माहिती सदस्यांना दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला जाणार असून एक प्रात्याक्षिकही दाखविले जाईल. तसेच पाणी टंचाई भाग-१ अंतर्गत ४८२ विंधन विहिरीचा आराखडा मंजुरीकरिता जिल्हाधिकाºयांना पाठविला. १६७९ हॅण्डपंपपैकी लोकसंख्येनिहाय १०८८ हॅण्डपंपाकरिता स्थळ निश्चित केले आहे. त्यापैकी २१७ हॅण्डपंपची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, विषय सभापती उकेश चव्हाण, सभापती पुष्पा वाघाडे, सभापती दीपक गेडाम, सदस्य जयप्रकाश वर्मा, डॉ. शिवाजी सोनसरे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी