शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तहानलेल्या वन्यजीवांसाठी जंगलात सौरऊर्जेवरचे बोअरवेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअसुविधा होणार दूर : दरवर्षी आटतात ७५ टक्के जलस्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी ७५ टक्के जलस्रोत उन्हामुळे कोरडे पडतात. यामुळे वन्यजीवांचे हाल होतात.वन्यजीवांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी २४ तासांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच जंगलात सौर उर्जेवर चालणारे बोअरवेल लावले जात आहेत. या वेळी वन विभाग मोठ्या संख्येने असे बोअरवेल उभारणार आहेत....२४ तास पाण्याची व्यवस्थावनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून २४ तास वॉटर होलमधून पाणी टपकत राहील. त्यातून वन्यजीव आपली तहान भागवू शकतील. सध्या वनविभागाने जंगलात तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. मात्र ते बोअरवेल हाताने हलवावे लागतात. त्यामुळे वॉटर होलमध्ये पाणी पूर्ण वेळ राहात नाही....असुविधा दूर होणारजंगलात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम वॉटर होलमध्ये हँडपंपाच्या मदतीने कर्मचारी पाणी भरत असत. मात्र हे काम सुविधाजनक नव्हते. धोकादायकही तेवढेच होते. अनेकदा तर मनुष्यबळाअभावी वॉटर होल भरले जात नसायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत असत. सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल हा या समस्येवर उत्तम उपाय ठरणार आहेत. यामुळे वॉटर होलमध्ये नेहमी पाणी उपलब्ध राहील, असा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे....

टॅग्स :wildlifeवन्यजीवWaterपाणी