शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

तहानलेल्या वन्यजीवांसाठी जंगलात सौरऊर्जेवरचे बोअरवेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअसुविधा होणार दूर : दरवर्षी आटतात ७५ टक्के जलस्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी ७५ टक्के जलस्रोत उन्हामुळे कोरडे पडतात. यामुळे वन्यजीवांचे हाल होतात.वन्यजीवांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी २४ तासांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच जंगलात सौर उर्जेवर चालणारे बोअरवेल लावले जात आहेत. या वेळी वन विभाग मोठ्या संख्येने असे बोअरवेल उभारणार आहेत....२४ तास पाण्याची व्यवस्थावनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून २४ तास वॉटर होलमधून पाणी टपकत राहील. त्यातून वन्यजीव आपली तहान भागवू शकतील. सध्या वनविभागाने जंगलात तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. मात्र ते बोअरवेल हाताने हलवावे लागतात. त्यामुळे वॉटर होलमध्ये पाणी पूर्ण वेळ राहात नाही....असुविधा दूर होणारजंगलात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम वॉटर होलमध्ये हँडपंपाच्या मदतीने कर्मचारी पाणी भरत असत. मात्र हे काम सुविधाजनक नव्हते. धोकादायकही तेवढेच होते. अनेकदा तर मनुष्यबळाअभावी वॉटर होल भरले जात नसायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत असत. सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल हा या समस्येवर उत्तम उपाय ठरणार आहेत. यामुळे वॉटर होलमध्ये नेहमी पाणी उपलब्ध राहील, असा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे....

टॅग्स :wildlifeवन्यजीवWaterपाणी