शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

समाजवाद म्हणजे साम्यवादात झालेली सुधारणा; ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 21:36 IST

Nagpur News समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले.

नागपूर : समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मीडिया वॉच पब्लिकेशनच्या वतीने आयोजित सुरेश द्वादशीवार लिखित ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांच्यासह मीडिया वॉचचे अविनाश दुधे, डॉ. सागर खादीवाला, डॉ. श्रीकांत तिडके, प्रेम लुनावत व्यासपीठावर उपस्थित होते.

समाजवाद हा अंत्योदयाचा पुरस्कार करतो. हा विचार एकेकाळी सर्व धर्मांनी मानला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’मध्येच समाजवाद दडला आहे. मात्र, कालांतराने लोकांनी धर्माच्या श्रद्धा स्वीकारल्या आणि विचारांना तिलांजली दिली. भांडवलदारांनी सरकार, धर्म, राजकारण सगळे ताब्यात घेतल्याने गरिबांच्या बाजूने कुणीच उभा नाही. एवढेच नव्हे तर जगाच्या इतिहासात कोणताही धर्म, गुरू किंवा ईश्वर गरिबांच्या बाजूने उभा असल्याचे दिसत नाही. मात्र, गरीब आपल्या गरिबीचा प्रश्न उपस्थित करत कधीच संघटित होत नाही, ही विवंचना आहे. गरिबांमध्ये गरिबीची चीड जोवर निर्माण होत नाही, तोवर ते संघटित होऊ शकत नाही आणि म्हणूनच समाजवादाला मरगळ आल्याचे सुरेश द्वादशीवार यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंत माने व देवेंद्र गावंडे यांच्यासह गिरीश गांधी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले तर आभार डॉ. सागर खादीवाला यांनी मानले.

.................

टॅग्स :literatureसाहित्य