शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

समाजवाद म्हणजे साम्यवादात झालेली सुधारणा; ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 21:36 IST

Nagpur News समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले.

नागपूर : समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मीडिया वॉच पब्लिकेशनच्या वतीने आयोजित सुरेश द्वादशीवार लिखित ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांच्यासह मीडिया वॉचचे अविनाश दुधे, डॉ. सागर खादीवाला, डॉ. श्रीकांत तिडके, प्रेम लुनावत व्यासपीठावर उपस्थित होते.

समाजवाद हा अंत्योदयाचा पुरस्कार करतो. हा विचार एकेकाळी सर्व धर्मांनी मानला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’मध्येच समाजवाद दडला आहे. मात्र, कालांतराने लोकांनी धर्माच्या श्रद्धा स्वीकारल्या आणि विचारांना तिलांजली दिली. भांडवलदारांनी सरकार, धर्म, राजकारण सगळे ताब्यात घेतल्याने गरिबांच्या बाजूने कुणीच उभा नाही. एवढेच नव्हे तर जगाच्या इतिहासात कोणताही धर्म, गुरू किंवा ईश्वर गरिबांच्या बाजूने उभा असल्याचे दिसत नाही. मात्र, गरीब आपल्या गरिबीचा प्रश्न उपस्थित करत कधीच संघटित होत नाही, ही विवंचना आहे. गरिबांमध्ये गरिबीची चीड जोवर निर्माण होत नाही, तोवर ते संघटित होऊ शकत नाही आणि म्हणूनच समाजवादाला मरगळ आल्याचे सुरेश द्वादशीवार यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंत माने व देवेंद्र गावंडे यांच्यासह गिरीश गांधी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले तर आभार डॉ. सागर खादीवाला यांनी मानले.

.................

टॅग्स :literatureसाहित्य