शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

समाजवाद म्हणजे साम्यवादात झालेली सुधारणा; ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 21:36 IST

Nagpur News समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले.

नागपूर : समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मीडिया वॉच पब्लिकेशनच्या वतीने आयोजित सुरेश द्वादशीवार लिखित ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांच्यासह मीडिया वॉचचे अविनाश दुधे, डॉ. सागर खादीवाला, डॉ. श्रीकांत तिडके, प्रेम लुनावत व्यासपीठावर उपस्थित होते.

समाजवाद हा अंत्योदयाचा पुरस्कार करतो. हा विचार एकेकाळी सर्व धर्मांनी मानला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’मध्येच समाजवाद दडला आहे. मात्र, कालांतराने लोकांनी धर्माच्या श्रद्धा स्वीकारल्या आणि विचारांना तिलांजली दिली. भांडवलदारांनी सरकार, धर्म, राजकारण सगळे ताब्यात घेतल्याने गरिबांच्या बाजूने कुणीच उभा नाही. एवढेच नव्हे तर जगाच्या इतिहासात कोणताही धर्म, गुरू किंवा ईश्वर गरिबांच्या बाजूने उभा असल्याचे दिसत नाही. मात्र, गरीब आपल्या गरिबीचा प्रश्न उपस्थित करत कधीच संघटित होत नाही, ही विवंचना आहे. गरिबांमध्ये गरिबीची चीड जोवर निर्माण होत नाही, तोवर ते संघटित होऊ शकत नाही आणि म्हणूनच समाजवादाला मरगळ आल्याचे सुरेश द्वादशीवार यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंत माने व देवेंद्र गावंडे यांच्यासह गिरीश गांधी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले तर आभार डॉ. सागर खादीवाला यांनी मानले.

.................

टॅग्स :literatureसाहित्य