शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

-तर अजनी वनाला डीम्ड फॉरेस्टचा दर्जा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 20:32 IST

Ajni Forest, nagpur news एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते.

ठळक मुद्देन्यायालयाच्या एका निर्णयात संकेत : वनविभागाने घ्यावा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते. सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धन कायद्याचा उल्लेख करीत एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सूचना केल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास अजनीवन परिसराला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा दिला जाऊ शकताे. मात्र वनविभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

माजी वन्यजीव अधीक्षक जयदीप दास यांनी वनविभागास पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी लाेकमतला माहिती दिली. डिसेंबर १९९६ साली तामिळनाडूच्या गाेदावर्मन विरुद्ध केंद्र शासन या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धनाचे स्पष्ट निर्देश दिले हाेते. न्यायालयाच्या मते केवळ ठरलेले जंगल म्हणजे फाॅरेस्ट नाही तर फाॅरेस्टची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. शहरातील मुबलक वनसंपदा असलेला भागही जंगल ठरताे. त्यानुसार सर्व राज्य शासनांनी संस्थेची निर्मिती करून असे भाग ओळखण्याचे आणि भविष्याच्या गरजेनुसार त्याचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले हाेते. याबाबत काेणत्याही राज्य सरकारांनी व जबाबदार संस्थांनी पुढाकार न घेतल्याची टीका दास यांनी केली. अंबाझरी व गाेरेवाडाप्रमाणे अजनी वनालाही स्वायत्त जंगल म्हणून घाेषित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली. यावर राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मुख्य वनसंरक्षकांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- भारतीय वनधाेरणानुसार देशात एकूण भूमीच्या ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. मात्र भारतात केवळ २१ टक्के आहे.

- स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काेणत्याच सरकारने वन धाेरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

- एका संस्थेच्या सॅटेलाईट सर्वेक्षणानुसार गेल्या १० वर्षात नागपूरचे ग्रीन कव्हर ३३ टक्क्यांनी घटले आहे.

- महापालिकेला मागील एका वर्षात कापलेल्या झाडांच्या बदल्यात ११ हजार नवीन झाडे लावायची हाेती.

- मात्र शहरात वृक्षाराेपण करण्यास जागा नसल्याचे कारण देत मनपाने ४०० झाडे लावून बाेळवण केल्याची माहिती आहे.

- वृक्षाराेपणास जागा नसताना अजनीतील झाडांच्या बदल्यात १९ हजार झाडे लावण्याचा दावा करणारे एनएचएआय झाडे लावणार कुठे, हा प्रश्न आहे.

टॅग्स :forestजंगलnagpurनागपूर