शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

-तर अजनी वनाला डीम्ड फॉरेस्टचा दर्जा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 20:32 IST

Ajni Forest, nagpur news एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते.

ठळक मुद्देन्यायालयाच्या एका निर्णयात संकेत : वनविभागाने घ्यावा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते. सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धन कायद्याचा उल्लेख करीत एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सूचना केल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास अजनीवन परिसराला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा दिला जाऊ शकताे. मात्र वनविभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

माजी वन्यजीव अधीक्षक जयदीप दास यांनी वनविभागास पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी लाेकमतला माहिती दिली. डिसेंबर १९९६ साली तामिळनाडूच्या गाेदावर्मन विरुद्ध केंद्र शासन या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धनाचे स्पष्ट निर्देश दिले हाेते. न्यायालयाच्या मते केवळ ठरलेले जंगल म्हणजे फाॅरेस्ट नाही तर फाॅरेस्टची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. शहरातील मुबलक वनसंपदा असलेला भागही जंगल ठरताे. त्यानुसार सर्व राज्य शासनांनी संस्थेची निर्मिती करून असे भाग ओळखण्याचे आणि भविष्याच्या गरजेनुसार त्याचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले हाेते. याबाबत काेणत्याही राज्य सरकारांनी व जबाबदार संस्थांनी पुढाकार न घेतल्याची टीका दास यांनी केली. अंबाझरी व गाेरेवाडाप्रमाणे अजनी वनालाही स्वायत्त जंगल म्हणून घाेषित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली. यावर राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मुख्य वनसंरक्षकांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- भारतीय वनधाेरणानुसार देशात एकूण भूमीच्या ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. मात्र भारतात केवळ २१ टक्के आहे.

- स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काेणत्याच सरकारने वन धाेरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

- एका संस्थेच्या सॅटेलाईट सर्वेक्षणानुसार गेल्या १० वर्षात नागपूरचे ग्रीन कव्हर ३३ टक्क्यांनी घटले आहे.

- महापालिकेला मागील एका वर्षात कापलेल्या झाडांच्या बदल्यात ११ हजार नवीन झाडे लावायची हाेती.

- मात्र शहरात वृक्षाराेपण करण्यास जागा नसल्याचे कारण देत मनपाने ४०० झाडे लावून बाेळवण केल्याची माहिती आहे.

- वृक्षाराेपणास जागा नसताना अजनीतील झाडांच्या बदल्यात १९ हजार झाडे लावण्याचा दावा करणारे एनएचएआय झाडे लावणार कुठे, हा प्रश्न आहे.

टॅग्स :forestजंगलnagpurनागपूर