शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

... तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:07 IST

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे.

नागपूर/मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या विधिमंडळात चर्चेला आला आहे. एकीकडे विधानसभा आणि विधानपरिषदेतही मराठा आरक्षणावर चर्चा होत आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात पुढील आंदोलनाची दिशा ठरत आहे. विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका सर्वपक्षीय आमदारांनी घेतली असून सभागृहात ती मांडण्यातही आली. तर, ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, अद्यापही आरक्षणाचा मुद्दा कसा सुटणार हाच खरा प्रश्न आहे. आता, याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगेंच्या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे. २५ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिला होता. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होतं, असे जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता आमदार बच्चू कडू यांनीही जरांगे पाटील यांना आपण शब्द दिला होता, हे सांगत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. 

सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, सरकारने आत्तापर्यंत काय केलं याचा अहवालही अद्याप दिलेला नाही. सरकारने काम चांगलं केलं असलं तरी त्याची लेखी स्वरुपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष मराठा समाजामध्ये असणार आहे. शिंदे समितीने काय केलं, किती मराठा समाजाला दाखले दिले, याचा अहवाल राज्य सरकारने आजपर्यंत दिला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

गुन्हे मागे घेण्यासंदर्भात, जे जे गुन्हे तात्काळ मागे घेता येऊ शकत होते, त्याही बाबतीत सरकारने पाऊले उचलले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत पाऊलं उचलली पाहिजेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. तसेच, मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेट द्यायला गेलो होतो, त्यावेळी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे, त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे असे मला वाटलं. त्यावेळी, ती भूमिका आम्ही निभावली, काही शब्द आमच्याकडून देण्यात आले आहेत. आता, ते शब्द पाळण्याची वेळ कदाचित आमच्यावर येऊ शकते. म्हणून, सरकारने जे शब्द आणि वेळ दिली होती ते पाळले पाहिजे. जर सरकारने हा शब्द पाळला नाही. तर, शब्दाचा धनी म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे. 

काय म्हणाले जरांगे पाटील

१७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBachhu Kaduबच्चू कडू