शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

... तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:07 IST

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे.

नागपूर/मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या विधिमंडळात चर्चेला आला आहे. एकीकडे विधानसभा आणि विधानपरिषदेतही मराठा आरक्षणावर चर्चा होत आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात पुढील आंदोलनाची दिशा ठरत आहे. विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका सर्वपक्षीय आमदारांनी घेतली असून सभागृहात ती मांडण्यातही आली. तर, ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, अद्यापही आरक्षणाचा मुद्दा कसा सुटणार हाच खरा प्रश्न आहे. आता, याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगेंच्या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे. २५ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिला होता. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होतं, असे जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता आमदार बच्चू कडू यांनीही जरांगे पाटील यांना आपण शब्द दिला होता, हे सांगत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. 

सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, सरकारने आत्तापर्यंत काय केलं याचा अहवालही अद्याप दिलेला नाही. सरकारने काम चांगलं केलं असलं तरी त्याची लेखी स्वरुपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष मराठा समाजामध्ये असणार आहे. शिंदे समितीने काय केलं, किती मराठा समाजाला दाखले दिले, याचा अहवाल राज्य सरकारने आजपर्यंत दिला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

गुन्हे मागे घेण्यासंदर्भात, जे जे गुन्हे तात्काळ मागे घेता येऊ शकत होते, त्याही बाबतीत सरकारने पाऊले उचलले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत पाऊलं उचलली पाहिजेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. तसेच, मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेट द्यायला गेलो होतो, त्यावेळी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे, त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे असे मला वाटलं. त्यावेळी, ती भूमिका आम्ही निभावली, काही शब्द आमच्याकडून देण्यात आले आहेत. आता, ते शब्द पाळण्याची वेळ कदाचित आमच्यावर येऊ शकते. म्हणून, सरकारने जे शब्द आणि वेळ दिली होती ते पाळले पाहिजे. जर सरकारने हा शब्द पाळला नाही. तर, शब्दाचा धनी म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे. 

काय म्हणाले जरांगे पाटील

१७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBachhu Kaduबच्चू कडू