शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

... म्हणून जिवंत कारागृहाबाहेर आलो : प्रा. जी. एन. साईबाबा

By नरेश डोंगरे | Updated: March 7, 2024 20:14 IST

कारागृहात प्रचंड नरकयातना मिळाल्या : मानवाधिकारासाठी काम करणे गुन्हा आहे काय

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सद्भावना राखणाऱ्या देश-विदेशातील अनेकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. त्याचमुळे कारागृहात प्रचंड नरकयातना मिळूनही मी जीवंत कारागृहाबाहेर येऊ शकलो, अशी भावना प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (वय ५३) यांनी आज पत्रकारांसमोर व्यक्त केली.

मंगळवारी न्यायालयाने प्रा. साईबाबा आणि अन्य संशयितांची निर्दोष मुक्ता केली. या पार्श्वभूमीवर, आज गुरुवारी सकाळी प्रा. साईबाबां यांना येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी मुक्त केले. यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे वकिल अॅड. निहालसिंह राठोड यांच्या कार्यालयात प्रा. साईबाबांनी प्रसार माध्यमासमोर आपल्या वेदना मांडल्या. न्यायालयावर विश्वास होता आणि त्याचमुळे सत्याचा विजय झाला, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.

प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना प्रा. साईबाबा म्हणाले, त्यावेळी ऑपरेशन ग्रीन हंट, सलवा जुडूम जोरात सुरू होते. याचवेळी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकावर मोठा अत्याचार केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या अत्याचाराला वाचा फोडून पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कागदपत्र संकलित करण्याचे काम डेमोक्रेटीक पिपल ऑफ दिल्ली या संस्थेचे विचारवंत सुरेंद्र मोहन, आयएएस अधिकारी बी. डी. शर्मा, स्वामी अग्निवेश आणि जस्टीस सच्चार यांनी आपल्याला सोपविले होते. पुढे ही कागदपत्रे सरकारकडे सादर करून पीडितांवरील अत्याचार दूर करण्यासाठी प्रयत्न होणार होते. त्याचेवळी मला अटक करण्यात आली आणि मी संकलित केलेली कागदपत्रे जप्त करून नक्षल समर्थक असल्याचा आरोप लावण्यात आला.

कुठलाही पुरावा नसताना चुकीच्या पध्दतीने केस तयार करून, संशयाच्या आधारे न्यायालयात खटला चालविला. विशेष म्हणजे, न्यायालयाने दोनदा निर्दोष सुटका केली. कदाचित भारताच्या इतिहासातील हे एकमेव प्रकरण असेल असे सांगून माझ्या आयुष्याची माैल्यवान १० वर्ष कोण परत करेल. मी कुटुंबापासून दुरावलो. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. तो सुवर्ण काळ कसा परत येणार, मानवाधिकारासाठी काम करणे गुन्हा आहे का, असे प्रश्नही साईबाबा यांनी उपस्थित केले.

कारागृहात जाण्यापूर्वी व्हील चेअर सोडल्यास आरोग्य उत्तम होते. कारागृहात नरक यातना मिळाल्या. अत्यावश्यक आरोग्य सुविधा सुध्दा मिळत नव्हती. कारागृहात मिळालेल्या वागणूकीमुळे शरीरात बोलण्याचे बळही उरले नव्हते. दलित, आदिवासीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरूध्द आवाज मोठा करणारे तसेच माझ्या समर्थनात ज्यांनी आवाज उठविला, तेदेखिल आज कारागृहात आहेत, असे सांगून त्यांनी या लढ्यात ज्यांनी मदत केली त्या नागपूर, दिल्ली आणि मुंबई येथील वकिलांचे त्यांनी आभार मानले.तरुण सहकाऱ्याचा मृत्यू वेदनादायी

एका निर्दोष सहकाऱ्याचा कारागृहात असताना मृत्यू झाला. तो तरुण होता, त्याला छोटीशी मुलगी आहे. साईबाबांसोबत अटक करून कारागृहात डांबलेल्या पांडू पोरा नरोटे (वय २८) याच्या मृत्युचे प्रकरण उपस्थित करून एखाद्या तरुणाचा सहजपणे कारागृहात कसा मृत्यू होऊ शकतो, असा लक्षवेधही साईबाबांनी पत्रकार परिषदेत केला.

यापुढेही कायदेशीर लढा देत राहील

मी शिक्षण, विद्यार्थी आणि वर्ग यापासून वेगळा राहू शकत नाही. त्यामुळे पुन्हा विद्यादानाचे काम करत राहील. त्याचप्रमाणे कुठे कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपण यापुढेही लढा देणार आहो. असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला साईबाबा यांच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिल मंडळी उपस्थित होती. 

टॅग्स :nagpurनागपूर