शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:04 IST

शेवटच्या दिवशीपर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी : प्रवेश फेरीदरम्यानही सुरू राहील नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा नसून ५५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपर्यंत काही ठरावीक महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत होती. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे २१ मे रोजी खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया २६ मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली, जी ३ जूनपर्यंत चालणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीमध्ये अडथळे येत असल्याने प्रक्रियेला पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या जवळपास ९८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. गुरुवारी ५ जूनला शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली. त्यातील ४१,८१५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले व ४१,१८९ विद्यार्थ्यांनी पार्ट-१ लॉक केले आहेत. ३७,७७४ विद्यार्थ्यांनी पार्ट-२ लॉक करून प्रवेश फेरीसाठी नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेरीदरम्यानही नोंदणी व पार्ट-१ लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार, असे सांगण्यात येत आहे. ११ तारखेपर्यंत अंतिम यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, शनिवारी प्राथमिक यादी लागल्यानंतर तक्रारींसाठी वेळ देत १० ते ११ तारखेपर्यंत अंतिम यादी लागण्याची व त्यानंतर प्रथम फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रिया