शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:04 IST

शेवटच्या दिवशीपर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी : प्रवेश फेरीदरम्यानही सुरू राहील नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा नसून ५५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपर्यंत काही ठरावीक महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत होती. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे २१ मे रोजी खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया २६ मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली, जी ३ जूनपर्यंत चालणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीमध्ये अडथळे येत असल्याने प्रक्रियेला पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या जवळपास ९८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. गुरुवारी ५ जूनला शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली. त्यातील ४१,८१५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले व ४१,१८९ विद्यार्थ्यांनी पार्ट-१ लॉक केले आहेत. ३७,७७४ विद्यार्थ्यांनी पार्ट-२ लॉक करून प्रवेश फेरीसाठी नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेरीदरम्यानही नोंदणी व पार्ट-१ लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार, असे सांगण्यात येत आहे. ११ तारखेपर्यंत अंतिम यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, शनिवारी प्राथमिक यादी लागल्यानंतर तक्रारींसाठी वेळ देत १० ते ११ तारखेपर्यंत अंतिम यादी लागण्याची व त्यानंतर प्रथम फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रिया