शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:04 IST

शेवटच्या दिवशीपर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी : प्रवेश फेरीदरम्यानही सुरू राहील नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा नसून ५५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपर्यंत काही ठरावीक महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत होती. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे २१ मे रोजी खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया २६ मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली, जी ३ जूनपर्यंत चालणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीमध्ये अडथळे येत असल्याने प्रक्रियेला पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या जवळपास ९८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. गुरुवारी ५ जूनला शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली. त्यातील ४१,८१५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले व ४१,१८९ विद्यार्थ्यांनी पार्ट-१ लॉक केले आहेत. ३७,७७४ विद्यार्थ्यांनी पार्ट-२ लॉक करून प्रवेश फेरीसाठी नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेरीदरम्यानही नोंदणी व पार्ट-१ लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार, असे सांगण्यात येत आहे. ११ तारखेपर्यंत अंतिम यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, शनिवारी प्राथमिक यादी लागल्यानंतर तक्रारींसाठी वेळ देत १० ते ११ तारखेपर्यंत अंतिम यादी लागण्याची व त्यानंतर प्रथम फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रिया