शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सर्पदंशाने गँगरीन झालेला पाय वाचविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:40 IST

एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या प्रयत्नांना यश : पेशीय प्रत्यारोपणाने धोका टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.समुद्रपूरच्या सालेरगाव येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालात काम करणाऱ्या एका तरुणाला काही दिवसांपूर्वी ‘व्हायपर’ जातीच्या विषारी सापाने चावा घेतला. त्याला गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णाला अत्यवस्थ स्थितीत ‘ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये आणण्यात आले. रुग्णाच्या डाव्या पायावर सूज येऊन तीव्र वेदना होत होत्या. पायात गँगरीन होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ.राजेश अटल व प्लास्टीक सर्जरी तज्ज्ञ डॉ.गौरव जन्नावार यांनी युवकावर ‘अँटी व्हेनम’ औषधांपासून उपचाराची सुरुवात केली. तपासणीनंतर, रुग्णाला डाव्या पायाला विषबाधेमुळे ‘व्हस्क्युलोटॉक्सिक’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. मूत्रपिंडावरही याचा प्रभाव पडला होता. विषबाधेमुळे डाव्या पायाच्या टाचेजवळ प्रचंड वेदना आणि गँगरीन अशी गुंतागुंत निर्माण झाली. डॉक्टरांनी तातडीने ‘अ‍ॅलो -ट्रान्सप्लान्टेशन’ म्हणजे पेशीय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. जन्नावार, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ.नीता देशपांडे आणि डॉ.अनिता पांडे यांच्या चमूने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉ. जन्नावार यांनी सांगितले, पारंपरिक पद्धतीने जखमेची मलमपट्टी केल्यास, ती भरून येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. शिवाय, पेशींचा विकासही उशिरा होतो. यामुळे रुग्णाच्या मांडीतील काही भाग ‘मायक्रोव्हस्क्युलर अ‍ॅनास्टॉमोसिस’ पद्धतीने टाचेच्याजागी प्रत्यारोपित करण्यात आला. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला. शिवाय रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली, असेही ते म्हणाले. डॉ. अटल यांनी सांगितले, विषारी सापांच्या चावण्याच्या घटना साधारणपणे, वैद्यकीय केंद्रांपासून दूर आणि बहुतांश दुर्गम ठिकाणी घडतात. यामुळे रुग्णालयात येईपर्यंत गुंतागुंत वाढलेली असते. तातडीने निर्णय व औषधोपचार करणे गरजेचे असते. या रुग्णाला आवश्यक सोयी लवकर उपलब्ध झाल्यामुळेच त्याचा जीव व पायही वाचला. नायरसन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष उदयभास्कर नायर यांनी डॉक्टरांच्या तत्परतेचे कौतुक केले. दरम्यान, रुग्णावर उपचार पूर्ण झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsnakeसाप