शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

नागपूर जिल्ह्यात ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:47 IST

तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रशासन उदासीननिवड झालेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची प्रतीक्षा

अरुण महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : शासनाने विविध कल्याणकारी योजनांसोबतच ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विविध नियमांचे पालन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती. मात्र, याला वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे यानिमित्ताने प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.२राज्य शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात ‘इको व्हिलेज’ ही योजना बंद करून त्याजागी ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. त्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले. या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुकास्तरावरील ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले होते. हा निधी संबंधित गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करावयाचा होता.वास्तवात, शासनाने या योजनेंतर्गत गावांची निवड केली खरी, पण संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसाची रक्कम मात्र दिली नाही.ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न आता संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी विचारत आहेत. काहींनी या दिरंगाईचे खापर प्रशासनावर फोडले असून, याला अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप केला.

निकष व स्वरूपात बदलराज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कार्यान्वयित करण्यात आली. त्यासाठी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश जारी करण्यात आला. शिवाय, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून दिली. याच नवीन निकषांच्या आधारावर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. याला १० महिने पूर्ण झाले आहेत.

सरपंच, ग्रामसेवकांचा गौरवया योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांचा महाराष्ट्रदिनी १ मे २०१७ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. त्यावेळी बक्षिसांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही.

टॅग्स :Governmentसरकार