शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:47 IST

तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रशासन उदासीननिवड झालेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची प्रतीक्षा

अरुण महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : शासनाने विविध कल्याणकारी योजनांसोबतच ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विविध नियमांचे पालन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती. मात्र, याला वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे यानिमित्ताने प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.२राज्य शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात ‘इको व्हिलेज’ ही योजना बंद करून त्याजागी ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. त्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले. या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुकास्तरावरील ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले होते. हा निधी संबंधित गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करावयाचा होता.वास्तवात, शासनाने या योजनेंतर्गत गावांची निवड केली खरी, पण संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसाची रक्कम मात्र दिली नाही.ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न आता संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी विचारत आहेत. काहींनी या दिरंगाईचे खापर प्रशासनावर फोडले असून, याला अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप केला.

निकष व स्वरूपात बदलराज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कार्यान्वयित करण्यात आली. त्यासाठी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश जारी करण्यात आला. शिवाय, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून दिली. याच नवीन निकषांच्या आधारावर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. याला १० महिने पूर्ण झाले आहेत.

सरपंच, ग्रामसेवकांचा गौरवया योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांचा महाराष्ट्रदिनी १ मे २०१७ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. त्यावेळी बक्षिसांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही.

टॅग्स :Governmentसरकार