शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:58 IST

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्दे'शक्ती'तील त्रुटी पूर्ण करून शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पाठवू : गृहमंत्री

नागपूर : नूपुर शर्मा प्रकरणात पोलिसांनी नियोजनबद्ध योजना आखली. सर्व समाज घटकांशी चर्चा करून शांततेचे आवाहन करण्यात आले. सर्व घटकांनी यात चांगला प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलीही दंगल घडली नाही, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी येथे केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, नूपुर शर्मा प्रकरणात महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत जेथे-जेथे दंगली घडल्या तेथील असामाजिक तत्त्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शक्ती कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु राष्ट्रपती कार्यालयाने या कायद्यात काही त्रुटी काढून हा कायदा परत पाठविला आहे. लवकरच यातील त्रुटी पूर्ण करून हा कायदा परत राष्ट्रपतींकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. कन्हान येथे कराटे प्रशिक्षकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात नेहमीच कैद्यांचा मृत्यू, मोबाइल सापडण्याच्या घटना घडतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, नागपूर कारागृह दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रस्ताव आहे. तुरुंगात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तंटामुक्ती अभियान पुनर्जीवित करणार

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सुरू असलेले तंटामुक्त गाव अभियान पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, या योजनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत.

नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडनेही प्रयत्न करावेत

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कठोर कारवाई करून नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सीमेपर्यंत हुसकावून लावले आहे. आता छत्तीसगड पोलिसांनीही नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरPoliceपोलिस