शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:58 IST

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्दे'शक्ती'तील त्रुटी पूर्ण करून शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पाठवू : गृहमंत्री

नागपूर : नूपुर शर्मा प्रकरणात पोलिसांनी नियोजनबद्ध योजना आखली. सर्व समाज घटकांशी चर्चा करून शांततेचे आवाहन करण्यात आले. सर्व घटकांनी यात चांगला प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलीही दंगल घडली नाही, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी येथे केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, नूपुर शर्मा प्रकरणात महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत जेथे-जेथे दंगली घडल्या तेथील असामाजिक तत्त्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शक्ती कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु राष्ट्रपती कार्यालयाने या कायद्यात काही त्रुटी काढून हा कायदा परत पाठविला आहे. लवकरच यातील त्रुटी पूर्ण करून हा कायदा परत राष्ट्रपतींकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. कन्हान येथे कराटे प्रशिक्षकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात नेहमीच कैद्यांचा मृत्यू, मोबाइल सापडण्याच्या घटना घडतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, नागपूर कारागृह दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रस्ताव आहे. तुरुंगात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तंटामुक्ती अभियान पुनर्जीवित करणार

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सुरू असलेले तंटामुक्त गाव अभियान पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, या योजनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत.

नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडनेही प्रयत्न करावेत

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कठोर कारवाई करून नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सीमेपर्यंत हुसकावून लावले आहे. आता छत्तीसगड पोलिसांनीही नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरPoliceपोलिस