शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:58 IST

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्दे'शक्ती'तील त्रुटी पूर्ण करून शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पाठवू : गृहमंत्री

नागपूर : नूपुर शर्मा प्रकरणात पोलिसांनी नियोजनबद्ध योजना आखली. सर्व समाज घटकांशी चर्चा करून शांततेचे आवाहन करण्यात आले. सर्व घटकांनी यात चांगला प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलीही दंगल घडली नाही, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी येथे केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, नूपुर शर्मा प्रकरणात महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत जेथे-जेथे दंगली घडल्या तेथील असामाजिक तत्त्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शक्ती कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु राष्ट्रपती कार्यालयाने या कायद्यात काही त्रुटी काढून हा कायदा परत पाठविला आहे. लवकरच यातील त्रुटी पूर्ण करून हा कायदा परत राष्ट्रपतींकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. कन्हान येथे कराटे प्रशिक्षकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात नेहमीच कैद्यांचा मृत्यू, मोबाइल सापडण्याच्या घटना घडतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, नागपूर कारागृह दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रस्ताव आहे. तुरुंगात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तंटामुक्ती अभियान पुनर्जीवित करणार

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सुरू असलेले तंटामुक्त गाव अभियान पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, या योजनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत.

नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडनेही प्रयत्न करावेत

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कठोर कारवाई करून नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सीमेपर्यंत हुसकावून लावले आहे. आता छत्तीसगड पोलिसांनीही नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरPoliceपोलिस