शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

ना सुधारली अवस्था, ना बदलली समाजाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 10:48 IST

Nagpur News २०१८ मध्ये इदाते व २००८ साली रेणके आयाेगाने सादर केलेल्या रिपाेर्टनुसार ८० ते ९० टक्के जमातींकडे उपजीविकेचे साधन नाही.

ठळक मुद्देभटक्या विमुक्तांच्या पदरी भटकंतीच ४६ जमातींचा नीति आयोगाकडे रिपोर्ट

निशांत वानखेडे

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही देशातील भटक्या विमुक्तांच्या अवस्थेत कुठलाच बदल झाला नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाच पूर्ण झाल्या नसताना शिक्षण व आरोग्याचा विषय दूरचाच ठरतो. एवढेच नाही तर त्यांच्याकडे पाहण्याच्या समाजाच्या आणि पोलिसांच्याही दृष्टिकोनात फारसा बदल झाला नाही. हा भारतीय मानव्य विज्ञान सर्वेक्षण विभागाचा रिपोर्ट आहे, जो त्यांनी नुकताच नीती आयोगाकडे सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नीती आयाेगाने देशातील भटक्या विमुक्त जमातींच्या सर्वेक्षणाचे काम मानव्य विज्ञान विभागाला दिले हाेते. इदाते कमिशनच्या रिपाेर्टनुसार सी-लिस्टमध्ये असलेल्या ६५ विशिष्ट जमातींचे हे सर्वेक्षण हाेते. विभागाच्या संशाेधकांनी २०१८ ते २०२० या काळात हे सर्वेक्षण केले. विभागाच्या नागपूर सेंटरचे सहायक संशाेधक राजकिशाेर महाताे यांनी लाेकमतशी बाेलताना या अहवालाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील पारधी, कैकाडी आदींसह झांसी, रेवाडी अशा ४६ जमातींचा ग्राऊंड रिपाेर्ट घेऊन नीती आयाेगाकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वेक्षणाचे पाच मुख्य बिंदू ठरविण्यात आले हाेते.

- त्यांची उपजीविका कशी आहे आणि राेजगार कशाप्रकारे केला जाताे.

- अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह शिक्षण, आराेग्याच्या साेयीसुविधा त्यांच्यापर्यंत पाेहचल्या काय.

- या भटक्या विमुक्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकाेन बदलला काय.

- पाेलिसांचा दृष्टिकाेन बदलला काय.

- शासनाच्या विकास याेजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पाेहचला काय.

ग्राऊंड रिपाेर्टची सत्य परिस्थिती

२०१८ मध्ये इदाते व २००८ साली रेणके आयाेगाने सादर केलेल्या रिपाेर्टनुसार ८० ते ९० टक्के जमातींकडे उपजीविकेचे साधन नाही. ७० टक्के लाेकांकडे पक्की घरे नाहीत. ७२ टक्के मुले शिक्षणापासून वंचित आहेत आणि एवढ्याच प्रमाणात लाेक आराेग्य सुविधांपासून वंचित आहेत. या रिपाेर्टमध्ये असलेल्या परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याचे राजकिशाेर महाताे यांनी स्पष्ट केले.

- स्वयंराेजगाराची इच्छा असलेल्यांना बँकाकडून आर्थिक मदत दिली जात नाही. अगदी मुद्रा लाेनचा लाभही त्यांनी मिळत नाही.

- गावातून शहरात आलेले लाेक कचरा वेचणे, साफसफाई करणे, केरसुणी बनविणे किंवा मजुरीची कामे करतात. गारुडी खेळ करणे हेही त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.

- एक ओळख नाही.

विदर्भात पारधी व कैकाडी या जमातींचा अनुसूचित जातीत समावेश आहे तर याच जमाती उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीमध्ये गणल्या जातात. राज्य पुनर्गठनाच्या काळात झालेली ही चूक अद्याप दुरुस्त झालेली नाही. हीच अवस्था मध्य प्रदेशातही आहे. तिथे पारधी जमातीचे काही लोक एससीमध्ये, काही एसटीमध्ये तर काही कशातच नाहीत.

टॅग्स :Socialसामाजिक