शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 21:33 IST

रेशीम धागा तयार करणारे राज्यातील १८ केंद्र (रेलिंग मशीन) पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम संचालनालयाने यासाठी पुढाकार घेतला असून निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील ही १८ केंद्र भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. एकप्रकारे याचे खासगीकरण करण्यात आले आहे. रेशीम संचालनालयाच्या नवनियुक्त संचालक भाग्यश्री बानायत यांनी याबाबत माहिती देताना पत्रपरिषदेत सांगितले की, रेशीम धागा तयार करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी (रेलिंग मशीन) केंद्र देण्यात आले.

ठळक मुद्देचार वर्षांपासून होते बंद : राज्यातील १८ केंद्र भाडेतत्त्वावर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीम धागा तयार करणारे राज्यातील १८ केंद्र (रेलिंग मशीन) पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम संचालनालयाने यासाठी पुढाकार घेतला असून निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील ही १८ केंद्र भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. एकप्रकारे याचे खासगीकरण करण्यात आले आहे. रेशीम संचालनालयाच्या नवनियुक्त संचालक भाग्यश्री बानायत यांनी याबाबत माहिती देताना पत्रपरिषदेत सांगितले की, रेशीम धागा तयार करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी (रेलिंग मशीन) केंद्र देण्यात आले. विदर्भात असे चार केंद्र आहेत. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून हे केंद्रच बंद आहेत. हमीभावापेक्षा खासगी लोकांकडून रेशमाला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्राला मिळत नाही. संचालक बानायत यांनी सांगितले की, रेशमाला १७८ रुपये किलो हमीभाव आहेत. तर खासगी व्यक्तींकडून ७०० ते ८०० रुपये किलोचा भाव देण्यात येत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी खासगीकडे जात आहे. परिणामी केंद्राकडे रेशीमच मिळत नसल्याने मशीनही बंद आहेत. बंद असल्याने मशीन खराब होण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या मशीन (केंद्र) खासगी व्यक्ती, संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, भाडेसंदर्भात अद्याप रक्कम निश्चित करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने एकूण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी पुन्हा एकदा रेशमाकडे मोर्चा वळविला आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात असून रेलिंग मशीन सुरू करणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.जालना व सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठसध्या शेतकऱ्यांना कर्नाटकमधील रामनगर येथील बाजारपेठेतून रेशीम कोष आणावे लागत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जालना आणि सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठही सुरू केली जात असल्याची माहितीही बानायत यांनी दिली.राज्यात रेशीम उत्पादनात ३०० पटीने वाढदेशाचा विचार केला तर एकीकडे आठ हजार मेट्रिक टन इतकी रेशीमची तूट आहे. तर महाराष्ट्रात मात्र रेशीम उत्पादन सातत्याने वाढत आहे. २०१५-१६ मध्ये २७३ मेट्रिक टन इतके उत्पादन होते. २०१६-१७ मध्ये ते २५९ वर आले तर १७-१८ मध्ये पुन्हा ३७० वर पोहोचले आहे. यंदा ६७० मेट्रिक टन इतके उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या ३७० टन इतके झाले आहे. तब्बल ३०० पटीने राज्यातील रेशीम उत्पादन वाढले आहे. नागपूरसह विदर्भातही ही वाढ आहे. परंतु यात आणखी संधी असून ती आणखी वाढावी, असे प्रयत्न चालविले जात आहे.बंगळुरू येथील अंडीपुंज केंद्र घेणार लीजवररेशीम अंडीपुंजांची मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या मागणीच्या तुलनेत अंडीपुंजाचा पुरवठा कमी झाला. हे अंडीपुंज निर्माण करण्याचे राज्यात दोन ठिकाणी केंद्र असून बंगळुरू येथून आणण्यात येते. आता विभागानेच हे अंडीपुंज निर्माण करण्याचे ठरविले आहे. यासाठी बंगळुरू येथील केंद्र लीजवर घेण्यात येणार असल्याचीही माहितीही त्यांनी दिली.दोन वर्षात ४० कोटी अनुदानाचे वाटपतुतीची शेती करणाऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी देण्यात येते. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो. गेल्या दोन वर्षात ४० कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून कोट्यवधीचे अनुदान थकित असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :nagpurनागपूर