शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वन पर्यटन बहरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:08 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारांचे आधुनिकीकरण होणार आहे. मोहर्लीत इंटरप्रिटिशन केंद्र सुरू होणार असून बेलोरा हे नवे गेट नववर्षदिनी ...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारांचे आधुनिकीकरण होणार आहे. मोहर्लीत इंटरप्रिटिशन केंद्र सुरू होणार असून बेलोरा हे नवे गेट नववर्षदिनी सुरू होत आहे. पर्यटनाला वाव देण्यासाठी मदनापूर (गोंडमैल) तलावात बोटिंग सुरू होत आहे. कन्हाळगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे नववर्षात विकासाची पाऊलवाट गोंडपिपरीमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

टिपेश्वर या नव्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राचा नव्या वर्षात क्षेत्रविस्तार होण्याची गरज आहे. खितपत पडलेल्या वनउद्यान, ॲाक्सिजन पार्कला नवसंजीवनी मिळावी, तसेच दारव्हा रोडवरील चंदनपार्क आणि बॉटनिकल गार्डनच्या विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे.

गडचिरोलीच्या जंगलात आता वाघांचा वावर सुरू झाला आहे. नववर्षात यासाठी नियोजनाची गरज आहे. रॅपिड रेस्क्यू युनिटच्या उभारणीसोबतच आलापल्लीमधील रानम्हशींसाठीच्या संरक्षित क्षेत्र आणि चपराळा अभयारण्याच्या विकासाची आठवण नववर्षात तरी वनविभागाला यावी.

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना लक्षात घेता बफर झोनच्या विस्ताराची गरज आहे. रेस्क्यू टीमला सक्षम केले जावे. सारंगपुरी (आर्वी) तलावाचा विकास आणि सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनारमधील प्रस्तावित सौंदर्यीकरण हे पर्यटकांचे नववर्षातील आशास्थान आहे. नावारूपास येत असलेल्या मेळघाटमधील पर्यटन आणि वनविकासाला असलेली निधीची गरज या वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भरपूर संधी आहेत. कोका, नागझिरा अभयारण्य, पवनी गेट येथील पर्यटनाला असलेला वाव तसेच नवेगाव-नागझिराचे पक्षिवैभव आणि वनातील जैवविविधता वनविभागाने या वर्षात तरी लक्षात घ्यायला हवी.

...

नव्या आशांचे बीजारोपण

कोरोनाचे संकट घेऊन आलेल्या २०२० या वर्षाने मनात भीतीचे काहूर माजविले असले तरी नव्या आशांचे बीजारोपणही केले आहे. नागपूर जिल्ह्यात गोरेवाडातील इंडियन सफारी, मोगरकसा इको टुरिझम, मुनिया वनक्षेत्र संरक्षित क्षेत्र होण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या हालचाली आशादायक आहेत. यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्याला मिळालेला स्वतंत्र व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा आणि चंद्रपुरातील कन्हाळगाव या नव्या अभयारण्याची घोषणा ही नव्या वर्षातील नवी आशास्थाने ठरली आहेत.