शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:36 IST

शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअनिल देशमुख : शेतीमालाला हमीभाव व नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जमाफीची घोषणा झाली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. ते तातडीने जमा करण्यात यावे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळी पॅकेजमध्ये काटोल व नरखेड तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. २०१४ या वर्षात देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे गारपीटग्रस्तांना मदत देण्यात यावी. तूर व चण्याची शासनाने खरेदी सुरू करावी. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सरकारकडून घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही. शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात काटोल व नरखेड तालुक्यात अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात २०१४ साली गारपीट झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून संत्रा,मोसंबीला प्रति एकरी ५० हजार, गहू, तूर, चणा व भाजीपाला पिकाला सरसकट प्रति एकरी ३० हजारांची मदत जाहीर केली होती. यावेळी किमान त्याधर्तीवर मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.बोंडअळीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या दोन्ही तालुक्यांना राज्य सरकाराच्या पॅकेजमधून वगळण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही. अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची मदत जमा झालेली नाही. हमीभावाचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या चार वर्षात यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हमीभावाने तूर व चणा खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे,अनुप खराडे, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, राष्ट्रवादीचे काटोलचे अध्यक्ष गणेश चन्ने, युवक अध्यक्ष गणेश सावरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर