शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:36 IST

शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअनिल देशमुख : शेतीमालाला हमीभाव व नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जमाफीची घोषणा झाली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. ते तातडीने जमा करण्यात यावे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळी पॅकेजमध्ये काटोल व नरखेड तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. २०१४ या वर्षात देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे गारपीटग्रस्तांना मदत देण्यात यावी. तूर व चण्याची शासनाने खरेदी सुरू करावी. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सरकारकडून घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही. शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात काटोल व नरखेड तालुक्यात अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात २०१४ साली गारपीट झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून संत्रा,मोसंबीला प्रति एकरी ५० हजार, गहू, तूर, चणा व भाजीपाला पिकाला सरसकट प्रति एकरी ३० हजारांची मदत जाहीर केली होती. यावेळी किमान त्याधर्तीवर मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.बोंडअळीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या दोन्ही तालुक्यांना राज्य सरकाराच्या पॅकेजमधून वगळण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही. अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची मदत जमा झालेली नाही. हमीभावाचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या चार वर्षात यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हमीभावाने तूर व चणा खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे,अनुप खराडे, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, राष्ट्रवादीचे काटोलचे अध्यक्ष गणेश चन्ने, युवक अध्यक्ष गणेश सावरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर