शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

शहीद जवानांचं तेरावं योग्य प्रकारे झालं- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:51 PM

भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.

ठळक मुद्दे ‘एअर स्ट्राईक’चे संघ परिवारातून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी जशास तसे उत्तर द्या असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका घेण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर संघाकडून अधिकृत भूमिकादेखील जाहीर करण्यात आली. तर सायंकाळी एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी आपली भावना व्यक्त केली. वायुदलाने ज्याप्रकारे कारवाई केली आहे, ती पाहता सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले.तर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील वायुसेना तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरोधात संताप होता. त्यांना कडक प्रत्युत्तर देण्यात यावे, अशीच भारतीय लोकांची इच्छा होती. भारतीय वायुसेनेने कोट्यवधी जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने पाकिस्तानी नागरिकांना कुठलीही हानी पोहोचविली नाही. वायुसेनेचे हे कार्य भारतीय सभ्यतेनुसारच झाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन असल्याचे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.मोदींनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखविलीराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या ‘एअरस्ट्राईक’बाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीचे अभिनंदनच व्हायला हवे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला कारवाईसाठी खुली सूट दिली हेदेखील महत्त्वाचे आहे. यातून त्यांनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. जर कुणी देशाकडे वाकडी मान करुन पाहिले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, हे या ‘स्ट्राईक’मधून सांगण्यात आले आहे. संरक्षण दलांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे व शत्रूला कुठलीही मनमानी करु दिली जाणार नाही, असे कारवाईतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकMohan Bhagwatमोहन भागवतindian air forceभारतीय हवाई दल