शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

धक्कादायक! कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास सरकारने सोडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:06 IST

Nagpur : सहा वर्षांपासून करीत आहे मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवरनागपूर : वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. हे कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, त्यांच्या मागणीला सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

प्रकाश मेश्राम, असे पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची ९ एप्रिल २०१२ रोजी पोलिस विभागात नियुक्ती झाली होती. पोलिस मुख्यालयातून मिळालेल्या आदेशानुसार, ते २० जानेवारी २०१९ रोजी खांबाडा क्षेत्रात कर्तव्यावर गेले होते व आवश्यक चौकशीसाठी धावती वाहने थांबवित होते.

दरम्यान, एका वाहनाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मेश्राम यांना चिरडले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर मेश्राम यांच्या पत्नी विशाखा यांनी राज्य सरकारला वेळोवेळी निवेदने सादर करून २९ नोव्हेंबर २००८ रोजीच्या निर्णयानुसार लाभ अदा करण्याची मागणी केली. यासंदर्भात प्रशासनस्तरावर पत्रव्यवहारही झाला. परंतु, मेश्राम यांचे कुटुंब अद्याप हक्काच्या लाभापासून वंचित आहे.

मेश्राम कुटुंब लाभास पात्रया प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, विशाखाच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी सरकारच्या भेदभावपूर्ण वागणुकीकडे लक्ष वेधले. सरकारने मेश्राम यांच्याप्रमाणेच मृत्यू झालेल्या छत्रपती चिडे यांच्या कुटुंबाला २९ नोव्हेंबर २००८ च्या निर्णयाचा लाभदिला आहे. परंतु, मेश्राम यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले आहे, असे अॅड. गिरटकर यांनी सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता मेश्राम यांचे कुटुंबही संबंधित लाभासाठी पात्र असल्याचे नमूद केले.

सरकारवर पाच हजारांचा दंडन्यायालयाने सरकारला १३ जानेवारी २०२५ रोजी नोटीस जारी करून उत्तर मागितले होते. त्यानंतर सरकारने उत्तराकरिता वेळोवेळी तारखा घेतल्या. त्यामुळे २ एप्रिल रोजी न्यायालयाने सरकारला शेवटची संधी म्हणून १६ एप्रिलपर्यंत वेळ वाढवून दिला. परंतु, सरकारने या मुदतीतही उत्तर दिले नाही. परिणामी, न्यायालयाने सरकारवर पाच हजार रुपये दंड ठोठावून ही रक्कम विशाखा यांना अदा करण्याचे निर्देश दिले. तसेच, येत्या २ मेपर्यंत भूमिका मांडण्यास पुन्हा अपयश आल्यास आवश्यक आदेश जारी केला जाईल, अशी तंबी दिली.

टॅग्स :nagpurनागपूर