शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

धक्कादायक वास्तव : लैंगिक शोषण, अत्याचाराला बळी पडून अल्पवयीन मुली झाल्या माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:13 IST

डॉ. अविनाश गावंडे यांचा अभ्यास : १२४ कुमारी मातांमध्ये ६७ अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक शोषण व अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मातांची संख्या वाढताना दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (आयजीएमसी) जानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ कुमारी मातांची नोंद झाली. यात तब्बल ६७ माता या अल्पवयीन होत्या. 'आयजीएमसी'चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पी. बी. राऊत व डॉ. उदय नारलावर यांच्या अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'आयएपीएसएमकॉन' या राष्ट्रीय परिषदेत डॉ. गावंडे यांनी हा अभ्यास मांडला. 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याची संख्या चिंताजनक आहे. अल्पवयात मातृत्व धारण करणे ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, जी केवळ मुलीच्या आरोग्यावर आणि भविष्यावरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही दूरगामी परिणाम करते.

१८ ते २१ वयोगटात २४ टक्के कुमारी माताजानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ मातांमध्ये १८ वर्षांखालील मुलींचे प्रमाण ५४ टक्के असताना १८ ते २१ वयोगटात कुमारी मातांचे प्रमाण २४ टक्के होते. २२ ते २५ वयोगटात १७ टक्के, तर २१ ते २५ वयोगटात ५ टक्के प्रमाण होते.

५४% बाळ कमी वजनांचीअल्पवयात गर्भधारणा आणि बाळंतपण हे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कुपोषण, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कमी वजनाची बाळ जन्माला येऊन जिवालाही धोका होऊ शकतो. प्रसूती झालेल्या ७५ प्रकरणांपैकी ५४ टक्के बाळ कमी वजनाची होती. यातील १२ टक्के बाळांचा मृत्यू झाला.

४८ टक्के कुमारी मातांनी दिला बाळाला जन्मनोंद झालेल्या कुमारी मातांपैकी ४८ टक्के कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला, तर ३३ टक्के कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. २४ आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला, तर २४ आठवड्यांनंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते. 

विशेष पुनर्वसन योजना हवीडॉ. गावंडे यांनी सांगितले, बळी पडलेल्या अल्पवयीन मातांना कायदेशीर मदत आणि संरक्षण पुरवणे आवश्यक आहे. कठोर कायदे, सामाजिक जागरूकता आणि योग्य आरोग्य सेवांच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण शक्य आहे. कुमारी मातांसाठी विशेष पुनर्वसन योजना हवी.

टॅग्स :nagpurनागपूर