शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव : लैंगिक शोषण, अत्याचाराला बळी पडून अल्पवयीन मुली झाल्या माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:13 IST

डॉ. अविनाश गावंडे यांचा अभ्यास : १२४ कुमारी मातांमध्ये ६७ अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक शोषण व अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मातांची संख्या वाढताना दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (आयजीएमसी) जानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ कुमारी मातांची नोंद झाली. यात तब्बल ६७ माता या अल्पवयीन होत्या. 'आयजीएमसी'चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पी. बी. राऊत व डॉ. उदय नारलावर यांच्या अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'आयएपीएसएमकॉन' या राष्ट्रीय परिषदेत डॉ. गावंडे यांनी हा अभ्यास मांडला. 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याची संख्या चिंताजनक आहे. अल्पवयात मातृत्व धारण करणे ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, जी केवळ मुलीच्या आरोग्यावर आणि भविष्यावरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही दूरगामी परिणाम करते.

१८ ते २१ वयोगटात २४ टक्के कुमारी माताजानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ मातांमध्ये १८ वर्षांखालील मुलींचे प्रमाण ५४ टक्के असताना १८ ते २१ वयोगटात कुमारी मातांचे प्रमाण २४ टक्के होते. २२ ते २५ वयोगटात १७ टक्के, तर २१ ते २५ वयोगटात ५ टक्के प्रमाण होते.

५४% बाळ कमी वजनांचीअल्पवयात गर्भधारणा आणि बाळंतपण हे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कुपोषण, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कमी वजनाची बाळ जन्माला येऊन जिवालाही धोका होऊ शकतो. प्रसूती झालेल्या ७५ प्रकरणांपैकी ५४ टक्के बाळ कमी वजनाची होती. यातील १२ टक्के बाळांचा मृत्यू झाला.

४८ टक्के कुमारी मातांनी दिला बाळाला जन्मनोंद झालेल्या कुमारी मातांपैकी ४८ टक्के कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला, तर ३३ टक्के कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. २४ आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला, तर २४ आठवड्यांनंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते. 

विशेष पुनर्वसन योजना हवीडॉ. गावंडे यांनी सांगितले, बळी पडलेल्या अल्पवयीन मातांना कायदेशीर मदत आणि संरक्षण पुरवणे आवश्यक आहे. कठोर कायदे, सामाजिक जागरूकता आणि योग्य आरोग्य सेवांच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण शक्य आहे. कुमारी मातांसाठी विशेष पुनर्वसन योजना हवी.

टॅग्स :nagpurनागपूर