शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 12:33 IST

जरीपटका, पाचपावली, नंदनवनमधील आकडेवारीदेखील चिंताजनक : ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जास्त आकडा

योगेश पांडे

नागपूर : राज्यात बेपत्ता झालेल्या मुली-महिलांच्या आकडेवारीवरून राजकारण तापले असताना नागपुरातदेखील हा आकडा चिंताजनक आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार महिन्यांत २० किंवा त्याहून अधिक मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. एमआयडीसी व कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वात जास्त जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. यातील काही मुली स्वत:च्या मर्जीने घर सोडून गेल्या असल्या तरी ज्यांचा शोधच लागलेला नाही, अशा मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९१२ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७१ महिला होत्या. चार महिन्यांत ३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील बहुतांश मुली घरातून निघून गेल्या होत्या. ‘लोकमत’नेच सर्वप्रथम यावर प्रकाश टाकला होता. मुली-महिलांच्या घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार एमआयडीसी व कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार महिन्यांत ३६ मुली व महिला बेपत्ता झाल्या. त्यातही जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च व एप्रिलमध्ये गायब होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. या दोन पोलिस ठाण्यांच्या पाठोपाठ जरीपटका व नंदनवन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून २९ मुली-महिला बेपत्ता झाल्याच्या नोंदी झाल्या. तर पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २८ मुली-महिला १२० दिवसांत बेपत्ता झाल्या.

२३ वर्षांपर्यंतच्या २०९ मुली बेपत्ता

सर्वसाधारणत: २३ वर्ष वयोगटातील मुली या विद्यार्थिनी असतात. कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक जणी असतात. या वयोगटातील २०९ मुली या कालावधीत बेपत्ता झाल्या आहेत. हा आकडा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. यात अभ्यासाचा दबाव, घरातील वाद यांच्यासह प्रेमप्रकरणं हे एक मोठे कारण मानले जाते.

शोध न लागलेल्या मुलींचे काय?

सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४७१ पैकी अर्ध्याहून अधिक मुली-महिलांचा शोध लागला तर अनेक जणी स्वत:हून घरी परतल्या. मात्र इतर जणींचा शोध लागलेला नाही. शोध न लागलेल्या या मुलींचे नेमके काय होते हा गंभीर प्रश्न आहे. पोलिसांच्या लेखी वर्षाच्या शेवटी शोध न लागलेल्या महिला असे लिहून आकडा लिहिण्यात येतो. मात्र याचे पुढे काय होते हा प्रश्न अनुत्तरीतच असतो. २०१६ पासून ते २०२२ या कालावधीत ८५७ महिला व मुलींचा शोधच लागला नव्हता. आता सव्वा सात वर्षांत शोध न लागलेल्या मुलींचा आकडा हजाराच्या वर पोहोचला आहे.

२० हून अधिक मुली-महिलांची नोंद

पोलिस ठाणे : आकडा

  • एमआयडीसी : ३६
  • कळमना : ३६
  • जरीपटका : २९
  • नंदनवन : २९
  • पाचपावली : २८
  • हुडकेश्वर : २५
  • अजनी : २४
  • वाठोडा : २२
  • सक्करदरा : २१
  • पारडी : २१
  • हिंगणा : २०

 

गायब झालेल्या मुली-महिला

महिना : बेपत्ता

  • जानेवारी : ८९
  • फेब्रुवारी : १११
  • मार्च : १३३
  • एप्रिल : १३८
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंWomenमहिलाnagpurनागपूर