शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धक्कादायक ! मनपाकडे कर्मचाऱ्यांची संख्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:11 IST

संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे. तसे तर मनपातील प्रत्येक कारभाराची लेखी नोंद होत असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु नागपूर शहरात मनपांतर्गत किती स्थायी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आहेत याचीच प्रशासनाकडे लेखी माहिती उपलब्ध नाही. अशा स्थितीत मनपामध्ये किती पारदर्शकता आहे हा संशोधनाचा विषय ठरु शकतो.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. मनपामध्ये किती स्थायी, कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचारी आहेत, मागील पाच वर्षांत किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले, किती कर्मचारी मागील तीन वर्षांपासून एकाच विभागात आहेत, इत्यादी प्रश्न यात विचारण्यात आले होते. जनमाहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मनपाकडे नेमके किती स्थायी, कंत्राटी किंवा तात्पुरते कर्मचारी आहेत याची संख्येत माहितीच नाही. मनपासारख्या यंत्रणेकडे कर्मचाºयांची संख्या उपलब्ध नसणे ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.दरम्यान, जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२० या ५१ महिन्याच्या कालावधीत मनपाने भ्रष्टाचार किंवा नियम न पाळल्याच्या प्रकरणात २३ कर्मचाºयांना कामावरुन काढले. २०१७ मध्ये सर्वाधिक १० जणांची उचलबांगडी झाली तर २०१८ मध्ये ६ लोकांना काढण्यात आले. २०२० मधील तीनच महिन्यात ४ लोकांना मनपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.तीन वर्षांपासून किती कर्मचाऱ्यांची बदली झाली ?नियमांनुसार वर्ग १ व २ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करणे आवश्यक आहे तर वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची पाच व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांची सात वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. झोनल स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या निवासाच्या क्षेत्राव्यतिरिक्त इतरत्र करण्याचे निर्देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून किती कर्मचारी एकाच विभागात काम करत आहेत व किती जणांची बदली झाली याची आकडेवारीदेखील मनपाकडे नाही. ही माहिती संकलित करण्याचेच काम सुरू असल्याचे उत्तर जनमाहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.मनपाविरोधात कर्मचाऱ्यांकडून १७७ खटलेदरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत कर्मचाऱ्यांकडून मनपाविरोधात न्यायालयात १७७ प्रकरणे दाखल करण्यात आली तर कर्मचाऱ्यांसंबंधी १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता