शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

धक्कादायक ! मनपाकडे कर्मचाऱ्यांची संख्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:11 IST

संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे. तसे तर मनपातील प्रत्येक कारभाराची लेखी नोंद होत असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु नागपूर शहरात मनपांतर्गत किती स्थायी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आहेत याचीच प्रशासनाकडे लेखी माहिती उपलब्ध नाही. अशा स्थितीत मनपामध्ये किती पारदर्शकता आहे हा संशोधनाचा विषय ठरु शकतो.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. मनपामध्ये किती स्थायी, कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचारी आहेत, मागील पाच वर्षांत किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले, किती कर्मचारी मागील तीन वर्षांपासून एकाच विभागात आहेत, इत्यादी प्रश्न यात विचारण्यात आले होते. जनमाहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मनपाकडे नेमके किती स्थायी, कंत्राटी किंवा तात्पुरते कर्मचारी आहेत याची संख्येत माहितीच नाही. मनपासारख्या यंत्रणेकडे कर्मचाºयांची संख्या उपलब्ध नसणे ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.दरम्यान, जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२० या ५१ महिन्याच्या कालावधीत मनपाने भ्रष्टाचार किंवा नियम न पाळल्याच्या प्रकरणात २३ कर्मचाºयांना कामावरुन काढले. २०१७ मध्ये सर्वाधिक १० जणांची उचलबांगडी झाली तर २०१८ मध्ये ६ लोकांना काढण्यात आले. २०२० मधील तीनच महिन्यात ४ लोकांना मनपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.तीन वर्षांपासून किती कर्मचाऱ्यांची बदली झाली ?नियमांनुसार वर्ग १ व २ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करणे आवश्यक आहे तर वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची पाच व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांची सात वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. झोनल स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या निवासाच्या क्षेत्राव्यतिरिक्त इतरत्र करण्याचे निर्देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून किती कर्मचारी एकाच विभागात काम करत आहेत व किती जणांची बदली झाली याची आकडेवारीदेखील मनपाकडे नाही. ही माहिती संकलित करण्याचेच काम सुरू असल्याचे उत्तर जनमाहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.मनपाविरोधात कर्मचाऱ्यांकडून १७७ खटलेदरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत कर्मचाऱ्यांकडून मनपाविरोधात न्यायालयात १७७ प्रकरणे दाखल करण्यात आली तर कर्मचाऱ्यांसंबंधी १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता