शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

धक्कादायक ! २०० मिलियन भारतीयांचा डाटा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:58 IST

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देफेसबुक ही डाटा विक्रीची कंपनी : सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.फेसबुककडून ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने डाटा विकत घेऊन, त्याचा निवडणुकीत वापर केला होता. हा डाटा ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने २०१५ मध्ये विकत घेतला होता. ८७ मिलियन फेसबुक युजर्सच्या डाटाचा दुरुपयोग झाल्याचे २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली होती. सोशल साईटचा असा दुरुपयोग होत असल्याबद्दल युएस संसदेने याची दखल घेऊन, युएस सिनेटरच्या माध्यमातून फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग याची चौकशी केली. यात त्याला ४४ प्रश्न विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांची उत्तरे देण्यात झुकेरबर्ग असमर्थ ठरला. काही प्रश्नांवर त्याने दिलगिरी व्यक्त केली. युएस सिनेटरने विचारलेले प्रश्न आणि मार्क झुकेरबर्गने दिलेली उत्तरे याचा सखोल अभ्यास अ‍ॅड. लिमये यांनी केला. त्यांनी केलेल्या अभ्यासातून सोशल मीडियावर शेअर होत असलेली माहिती असुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यामते भारतात २०० मिलियन लोक फेसबुकचा वापर करतात. भारतीय हे डिजिटली निरीक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लिमये यांच्या मते निव्वळ फेसबुकचा डाटा स्टोअर होत नाही तर फेसबुक ज्या माध्यमातून आपण वापरतो, त्या माध्यमातून जे काही अ‍ॅपस वेबसाईटवर आपण काम करतो, वापरतो तो सर्व डाटा सुद्धा फेसबुकला स्टोअर होतो. जसे मोबाईलवरून आपण बँकेचे व्यवहार करतो आणि त्या मोबाईलवरून फेसबुकसुद्धा वापरत असेल तर बँकिंग व्यवहाराची सर्व माहिती फेसबुककडे स्टोअर होते.लिमयेंच्या मते भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फेसबुक, गुगलने सर्वाधिक पैसा कमविला आहे. आता सरकार आपली प्रत्येक स्कीम सोशल मीडियावर आणते आहे. सोशल मीडियावरील डाटाचा असा दुरुपयोग होत असेल तर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळे सरकारनेदेखील त्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.- डाटा सोशल मीडियावर शेअर करू नकाअ‍ॅड. लिमये यांच्या मते त्रास होईल असा डाटा सोशल मीडियावर शेअर करू नका. मोबाईलवरून बँकेचे व्यवहार टाळावे. सरकारनेसुद्धा सोशल मीडियाचा अपेक्षित वापर टाळावा.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर