शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

"यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 16:02 IST

महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 

नागपूर : यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत दिले आहे. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून या अशा शिखंडीना पुढे केले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजप व सद्यपरिस्थितीवर कडाडून टीका केली. सध्यांच भाजपच नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान देत असतील तर तो त्यांचा खुळचटपणा आहे. असे कित्येक आव्हान शिवसेनेने पेलले, असे राऊत म्हणाले. महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका.वीस फूट खाली गाडले जाल, असा इशारा त्यांनी दिला. 

बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. हनुमान चालिसा पठण कुठेही करता येईल मात्र, त्यासाठी मातोश्रीची निवड करणं व त्यामागे कट-कारस्तान करणं हाच त्यांचा उद्देश्य आहे. ज्यांना हिंदुत्व शब्द घ्यायला लाज वाटत होती. आज तेच, श्रीराम, हनुमान यांच नाव घेऊन राजकारण करत आहे. बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवते, अशा बोगस खासदारांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये, असे राऊत म्हणाले. यासह, पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले.

सत्तेशिवाय तुमचा जीव तडफडतो आमचा नाही. तुम्हा गटांगळ्या खातायत आम्ही नाही. स्वत:ची पुढे येण्याची हिम्मत नाही व दुसऱ्यांना पुढे करून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर मिळेल. या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपलं कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी ठासून सांगितले. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत व यांच्यामागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते उभे राहतात असा थेट आरोप राऊत यांनी फडणवीसांवर केला.

मी आभार मानतो या लोकांच कारण त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद दिसून येते, शिवसेनेच मनगट किती मजबूत आहे याची प्रचिती आली. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील. यापुढे शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या स्मशानाच्या गोवऱ्या रचून यावं, असे राऊत म्हणाले. यासह अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कधीकाळी आमचे पाच आमदार होते. लवकरच मोठा मेळावा लावत आहोत. यापुढे अमरावतीत शिवसेनेचाच बोलबाला असेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस