शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

"यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 16:02 IST

महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 

नागपूर : यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत दिले आहे. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून या अशा शिखंडीना पुढे केले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजप व सद्यपरिस्थितीवर कडाडून टीका केली. सध्यांच भाजपच नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान देत असतील तर तो त्यांचा खुळचटपणा आहे. असे कित्येक आव्हान शिवसेनेने पेलले, असे राऊत म्हणाले. महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका.वीस फूट खाली गाडले जाल, असा इशारा त्यांनी दिला. 

बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. हनुमान चालिसा पठण कुठेही करता येईल मात्र, त्यासाठी मातोश्रीची निवड करणं व त्यामागे कट-कारस्तान करणं हाच त्यांचा उद्देश्य आहे. ज्यांना हिंदुत्व शब्द घ्यायला लाज वाटत होती. आज तेच, श्रीराम, हनुमान यांच नाव घेऊन राजकारण करत आहे. बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवते, अशा बोगस खासदारांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये, असे राऊत म्हणाले. यासह, पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले.

सत्तेशिवाय तुमचा जीव तडफडतो आमचा नाही. तुम्हा गटांगळ्या खातायत आम्ही नाही. स्वत:ची पुढे येण्याची हिम्मत नाही व दुसऱ्यांना पुढे करून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर मिळेल. या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपलं कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी ठासून सांगितले. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत व यांच्यामागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते उभे राहतात असा थेट आरोप राऊत यांनी फडणवीसांवर केला.

मी आभार मानतो या लोकांच कारण त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद दिसून येते, शिवसेनेच मनगट किती मजबूत आहे याची प्रचिती आली. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील. यापुढे शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या स्मशानाच्या गोवऱ्या रचून यावं, असे राऊत म्हणाले. यासह अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कधीकाळी आमचे पाच आमदार होते. लवकरच मोठा मेळावा लावत आहोत. यापुढे अमरावतीत शिवसेनेचाच बोलबाला असेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस