शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कार्यकर्त्यांमध्ये खदखद तर नेते म्हणतात ‘ऑल इज वेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 12:40 IST

आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेत समन्वयाचा अभाव कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज

नागपूर : महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. महाविकासआघाडीतील तीनही पक्षांमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे वारंवार संकेत मिळत आहेत. नागपुरातदेखील या तीनही पक्षांच्या बरेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबाबत नाराजी आहे. कार्यकर्त्यांमध्ये खदखद असताना नेते मात्र ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करीत आहेत.

आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. महामंडळांवरदेखील नियुक्त्या झालेल्या नाहीत व सातत्याने डावलण्यात येत असल्याचा सूर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेसचे पदाधिकारी योग्य समन्वय साधत नसल्याचीदेखील तक्रार आहे. मात्र, याबाबत नेते उघडपणे बोलायला तयार नाहीत. तीनही पक्षांत सर्व काही ठीक असून, सातत्याने एकमेकांशी संवाद साधला जात असल्याची भूमिका नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेला काही किंमत उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तीन दिशांना तीन तोंडे

नेत्यांकडून सर्व काही ठीक असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तीनही पक्षांच्या नेत्यांची तोंडे तीन दिशेला असल्याचे वारंवार दिसून आले. पक्षांच्या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रहदेखील धरला.

काँग्रेसशी विसंवाद नाही

तीनही पक्षांमध्ये कुठलाच विसंवाद नाही. काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलेली शक्य तेवढी कामे ते करतात. काही कामांना निश्चितच उशीर झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे काही बाबी खोळंबल्या. त्याचा फटका बाकी पक्षांनाही बसला. मात्र, बाकी सर्व ठीक आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कार्यकर्त्यांचादेखील योग्य समन्वय

काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचा शिवसेना व राष्ट्रवादीसोबत योग्य समन्वय आहे. तीनही पक्षांमध्ये काहीच नाराजी नाही. काही त्रुटी असल्या तर त्या दूर करण्याचा प्रयत्न होत असतो.

-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी