शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कार्यकर्त्यांमध्ये खदखद तर नेते म्हणतात ‘ऑल इज वेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 12:40 IST

आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेत समन्वयाचा अभाव कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज

नागपूर : महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. महाविकासआघाडीतील तीनही पक्षांमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे वारंवार संकेत मिळत आहेत. नागपुरातदेखील या तीनही पक्षांच्या बरेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबाबत नाराजी आहे. कार्यकर्त्यांमध्ये खदखद असताना नेते मात्र ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करीत आहेत.

आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. महामंडळांवरदेखील नियुक्त्या झालेल्या नाहीत व सातत्याने डावलण्यात येत असल्याचा सूर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेसचे पदाधिकारी योग्य समन्वय साधत नसल्याचीदेखील तक्रार आहे. मात्र, याबाबत नेते उघडपणे बोलायला तयार नाहीत. तीनही पक्षांत सर्व काही ठीक असून, सातत्याने एकमेकांशी संवाद साधला जात असल्याची भूमिका नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेला काही किंमत उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तीन दिशांना तीन तोंडे

नेत्यांकडून सर्व काही ठीक असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तीनही पक्षांच्या नेत्यांची तोंडे तीन दिशेला असल्याचे वारंवार दिसून आले. पक्षांच्या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रहदेखील धरला.

काँग्रेसशी विसंवाद नाही

तीनही पक्षांमध्ये कुठलाच विसंवाद नाही. काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलेली शक्य तेवढी कामे ते करतात. काही कामांना निश्चितच उशीर झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे काही बाबी खोळंबल्या. त्याचा फटका बाकी पक्षांनाही बसला. मात्र, बाकी सर्व ठीक आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कार्यकर्त्यांचादेखील योग्य समन्वय

काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचा शिवसेना व राष्ट्रवादीसोबत योग्य समन्वय आहे. तीनही पक्षांमध्ये काहीच नाराजी नाही. काही त्रुटी असल्या तर त्या दूर करण्याचा प्रयत्न होत असतो.

-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी