शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे 

By रवींद्र चांदेकर | Updated: March 27, 2024 18:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस सुरू.      

रवींद्र चांदेकर, वर्धा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरूच आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजपाने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी बहाल केली आहे. अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार घाेषित झाला नाही. केवळ काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे मतदार संघात फिरून आपण राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे सांगत सुटले आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. इच्छूक उमेदवार शैलेश अग्रवाल, नितेश कराळे आदींनी काळे यांनी आधी पक्षाचा राजीनामा देण्याचा घोषा लावला आहे, तर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी काळे यांनी आमची उमेदवारी पळविल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, अर्ज भरण्याचा दिवस तोंडावर आला असताना महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नाही. तथापि, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्चत झाले आहे. परिणामी यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसणार आहे. काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. त्यातही प्रचाराला अवघे १५ ते १६ दिवसच मिळणार आहे. एवढ्या कमी दिवसांत मतदारांसमोर नवीन चिन्ह घेऊन जाताना आघाडीच्या उमेदवारालाही चांगलाच घाम फुटणार आहे.

भाजपचा प्रचार सुरू, आघाडीत लाथाळी-

भाजपने उमेदवार घोषित करून अनधिकृतपणे प्रचाराला सुरूवातही केली आहे. त्यांचे उमेदवार विधानसभानिहाय दौरे करीत आहे. मात्र, महाविकास आघाडीत अर्ज भरण्याचा दिवस आला तरी अंतर्गत लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले नेते संभाव्य उमेदवाराला विरोध करीत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील ही अंतर्गत धुसफूस शमविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे. हे आव्हान शमविल्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल, असा कयास वर्तविला जात आहे.

आजपासून दाखल होणार अर्ज -

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार, २८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ५ एप्रिलला प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ९ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात होईल. मतदानाच्या ४८ तासांआधी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे २४ मार्च रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होणार असल्याने उमेदवारांना केवळ १६ दिवस मिळणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस