शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे 

By रवींद्र चांदेकर | Updated: March 27, 2024 18:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस सुरू.      

रवींद्र चांदेकर, वर्धा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरूच आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजपाने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी बहाल केली आहे. अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार घाेषित झाला नाही. केवळ काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे मतदार संघात फिरून आपण राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे सांगत सुटले आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. इच्छूक उमेदवार शैलेश अग्रवाल, नितेश कराळे आदींनी काळे यांनी आधी पक्षाचा राजीनामा देण्याचा घोषा लावला आहे, तर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी काळे यांनी आमची उमेदवारी पळविल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, अर्ज भरण्याचा दिवस तोंडावर आला असताना महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नाही. तथापि, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्चत झाले आहे. परिणामी यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसणार आहे. काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. त्यातही प्रचाराला अवघे १५ ते १६ दिवसच मिळणार आहे. एवढ्या कमी दिवसांत मतदारांसमोर नवीन चिन्ह घेऊन जाताना आघाडीच्या उमेदवारालाही चांगलाच घाम फुटणार आहे.

भाजपचा प्रचार सुरू, आघाडीत लाथाळी-

भाजपने उमेदवार घोषित करून अनधिकृतपणे प्रचाराला सुरूवातही केली आहे. त्यांचे उमेदवार विधानसभानिहाय दौरे करीत आहे. मात्र, महाविकास आघाडीत अर्ज भरण्याचा दिवस आला तरी अंतर्गत लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले नेते संभाव्य उमेदवाराला विरोध करीत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील ही अंतर्गत धुसफूस शमविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे. हे आव्हान शमविल्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल, असा कयास वर्तविला जात आहे.

आजपासून दाखल होणार अर्ज -

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार, २८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ५ एप्रिलला प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ९ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात होईल. मतदानाच्या ४८ तासांआधी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे २४ मार्च रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होणार असल्याने उमेदवारांना केवळ १६ दिवस मिळणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस