शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे 

By रवींद्र चांदेकर | Updated: March 27, 2024 18:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस सुरू.      

रवींद्र चांदेकर, वर्धा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरूच आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजपाने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी बहाल केली आहे. अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार घाेषित झाला नाही. केवळ काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे मतदार संघात फिरून आपण राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे सांगत सुटले आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. इच्छूक उमेदवार शैलेश अग्रवाल, नितेश कराळे आदींनी काळे यांनी आधी पक्षाचा राजीनामा देण्याचा घोषा लावला आहे, तर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी काळे यांनी आमची उमेदवारी पळविल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, अर्ज भरण्याचा दिवस तोंडावर आला असताना महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नाही. तथापि, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्चत झाले आहे. परिणामी यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसणार आहे. काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. त्यातही प्रचाराला अवघे १५ ते १६ दिवसच मिळणार आहे. एवढ्या कमी दिवसांत मतदारांसमोर नवीन चिन्ह घेऊन जाताना आघाडीच्या उमेदवारालाही चांगलाच घाम फुटणार आहे.

भाजपचा प्रचार सुरू, आघाडीत लाथाळी-

भाजपने उमेदवार घोषित करून अनधिकृतपणे प्रचाराला सुरूवातही केली आहे. त्यांचे उमेदवार विधानसभानिहाय दौरे करीत आहे. मात्र, महाविकास आघाडीत अर्ज भरण्याचा दिवस आला तरी अंतर्गत लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले नेते संभाव्य उमेदवाराला विरोध करीत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील ही अंतर्गत धुसफूस शमविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे. हे आव्हान शमविल्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल, असा कयास वर्तविला जात आहे.

आजपासून दाखल होणार अर्ज -

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार, २८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ५ एप्रिलला प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ९ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात होईल. मतदानाच्या ४८ तासांआधी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे २४ मार्च रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होणार असल्याने उमेदवारांना केवळ १६ दिवस मिळणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस