शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मुलाचा वाढदिवस साजरा करून तिने सोडला जीव; ऑफिसमध्ये वारंवार अपमान,नोकरी धोक्यात आणण्याचा कट बेतला जीवावर ?

By नरेश डोंगरे | Updated: October 27, 2025 20:37 IST

Nagpur : असह्य छळामुळे उच्चाधिकारी महिलेचा करुण अंत ; न्यायासाठी पतीचा वेदनादायी संघर्ष

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मृत्यूचा पाश आवळत असल्याची तिला जाणीव झाली असावी. म्हणून की काय वसुंधराने पतीसोबत आपल्या चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. तीन वर्षीय केदार आणि सहा वर्षीय कबीरचे मनसोक्त लाड केले. ‘पुढच्या वाढदिवसाला आपण नसू’ याची वसुंधराला जाणीव झाली होती. त्यामुळे तिने हॉस्पिटलमध्येच केक मागवला आणि मृत्यूच्या सावटाखाली लाडक्या कबीरचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वसुंधराने आपले आक्रंदन दाबून घेतले. मुले बाहेर गेल्यानंतर ती हमसून हमसून रडली अन् पुढच्या सहा दिवसांनंतर वसुंधराने जीव सोडला. भरले कुटुंब कायमचे सोडण्यापूर्वी पतीला तिने साद घातली. मृत्यूला कारणीभूत असलेल्या शोभाला कायदेशीर धडा शिकवा, ही तिची शेवटची विनंती होती.

‘बॉस’च्या प्रचंड छळामुळे थेट मृत्यूच्या जबड्यात पोहोचलेल्या वसुंधरा गुल्हाणे-मिठेचा करुण अंत झाला. तेव्हापासून आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन तिचा पती पुष्पक न्यायासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहे. पाच महिने झाले, मात्र निगरगट्ट यंत्रणेकडून पुष्पक व त्याच्या दोन चिमुकल्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. दरम्यान, शुक्रवारी थेट पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमातच महिला अधिकाऱ्याच्या बेदरकार वर्तनाने टपाल खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि याच खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्या निर्दयी वृत्तीचा बळी ठरलेल्या उच्चाधिकारी महिलेच्या मृत्यू प्रकरणावर नव्याने उजेड पडला.

सुपर क्लास-वनपर्यंतचा विलक्षण प्रवास

नेरपरसोपंत गावची वसुंधरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. नवोदय शाळेतील शिक्षणानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळला केले. त्यानंतर मुंबईच्या कॉलेजमधून बीएएमएस केले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर २०१२ एमपीएससी थ्रू डेप्युटी कलेक्टर बनली. लगेच २०१३ ला यूपीएससी क्रॅक करून आयपीओएस (इंडियन पोस्टल ऑफिसर्स सर्व्हिसेस) म्हणून सिलेक्शन झाले. होशंगाबाद, नागपूर, अमरावतीला सेवा दिल्यानंतर प्रमोशनवर नागपूरला १ जानेवारी २०२४ रोजी डीपीएस म्हणून रुजू झाली. येथे पोस्टमास्तर जनरल शोभा मथाळे होत्या. ऑफिसमध्ये वारंवार अपमान, टोचून बोलणे, चारित्र्यावर शिंतोडे उडवून नोकरी धोक्यात आणण्याची भीती वसुंधराला दाखवण्यात आली. १६ महिन्यांचा तो असह्य छळ वसुंधरा पतीला सांगत होती आणि तो धीर देत होता. मात्र, सततच्या मनस्तापामुळे ऑटो युमिनिटी डिसऑर्डर हा आजार झाला. तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात ७ मे २०२५ ला भरती करण्यात आले. मृत्यू जवळ असल्याची जाणीव झाल्याने वसुंधराने १० मे रोजी पतीसह दोन्ही चिमुकल्यांना बोलावून घेतले. त्यांचे मनसोक्त लाड केले. कबीरचा बर्थ डे केक बेडजवळ कापला अन् १६ मे रोजी तिने सर्वांचा कायमचा निरोप घेतला.

अस्वस्थ पती अन् निरागस चिमुकले

तेव्हापासून अस्वस्थ पुष्पक आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मथाळेवर कारवाई करा, अशी मागणी घेऊन याचे-त्याचे उंबरठे झिजवत आहे. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही त्याने निवेदने पाठवली आहेत. मृत्यूपूर्वी छळाची कथा लिहून ठेवलेला वसुंधराचा लॅपटॉप त्याने चाैकशी अधिकाऱ्यांना सोपविला आहे. मात्र, वसुंधराच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या ‘बॉस’वर अद्याप कारवाई झालेली नाही. निगरगट्ट यंत्रणा सैरभैर पुष्पक आणि नाहकच आई गमावलेल्या निरागस चिमुकल्यांवरही दया-माया दाखवायला तयार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Ends Life After Birthday; Workplace Harassment Suspected Cause

Web Summary : Nagpur woman, facing office harassment, celebrated her child's birthday in the hospital, sensing her end. She requested justice against her boss before passing away, leaving behind a grieving family seeking accountability for the alleged mistreatment.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी