शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेस नेत्यांना सवाल करीत केले ‘खामोश’, म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 11:42 IST

काँग्रेस नेत्यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसने देशाच्या नवनिर्माणात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन

नागपूर : हार्दिक पटेल, शत्रुघ्न सिन्हा अशा एका मागून एक लोक का काँग्रेसमधून जात आहेत, त्यांना का जाऊ दिले ? प्रत्येकजण काही राज्यसभेच्या खासदारकीसाठी गेलेला नाही. त्यांना मान, सन्मान, प्रेम मिळाले नसेल. दिलेला शब्द पाळला नसेल. मी पण व्यक्तिगत कारणांनी काँग्रेस सोडलेली नाही. पक्षातील काही लोक चुकीच्या हरकती करतात. दिलेला शब्द मोडतात, असे खडे बोल सुनावत तृणमूल काँग्रसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंचावर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांना खामोश केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा रविवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अ.भा. काँग्रेसचे सचिव आशीष दुआ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांसमक्ष शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण काँग्रेस का सोडली, याची कारणमीमांसा मांडली.

सिन्हा म्हणाले, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी माझे लोकसभेच्या तिकिटासाठी नाव दिले तेव्ही मी काँग्रेस सोडण्याबाबत संभ्रमात होतो. त्यावेळी अनेकांशी चर्चा केली. काँग्रेसमध्ये कुणाकडे आपली बाज मांडावी, आपले कोण ऐकून घेईल हा मूळ प्रश्न आहे. मी माझा फिडबॅक देत आहे, आपण तो योग्य जागी पोहचवावा, अशी अपेक्षाही त्यांनी आशीष दुआ यांच्याकडे व्यक्त केली. मी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलो; पण तत्त्वांसाठी जो पक्ष (भाजप) मी सोडला होता, त्या पक्षात गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत देशाची व काळाची गरज लक्षात घेता विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसच्या योगदानाची प्रशंसा

काँग्रेस नेत्यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसने देशाच्या नवनिर्माणात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. हा महात्मा गांधी, नेहरू, इंदिराजींचा पक्ष आहे. आज देशात जेवढी महागाई, बेरोजगारी वाढलेली दिसते तेवढी काँग्रेसच्या काळात नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस