शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शहीद शंकर महाले जयंती विशेष; 'रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्म घेईन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 07:10 IST

Nagpur News स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यात एक नाव शहीद शंकर महाले यांचेही आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले.

निशांत वानखेडे

नागपूर : स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात अनेक स्वातंत्र सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यात एक नाव शहीद शंकर महाले यांचेही आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले; पण हा तरुण डगमगला नाही. फासावर जात असताना कुटुंबाचे सदस्य धायमाेकलून रडत हाेते. त्यावेळी शंकर यांनीच त्यांना धीर देत काकूला संबाेधले, ‘रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्माला येईन; पण बाेलणार काहीच नाही.’

शहीद शंकर महाले यांचे चुलत भाऊ गजाननराव महाले यांनी त्या आठवणी जागविल्या. शंकर हे वडील दाजिबा यांचे एकुलते एक पुत्र हाेते. दाजिबा यांच्या दाेन भावांपैकी माेरबाजी यांना पाच भाऊ व एक बहीण हाेती. त्यातीलच एक गजाननराव. ते मानेवाडा राेडवर जवाहरनगर येथे राहतात; पण त्यांचे कुटुंब आताही जुन्याच ठिकाणी नवाबपुरा येथे राहते. शंकर महाले यांच्या कथनानुसार वर्षभरानंतर काकूला दुसरा मुलगा झाला. कालांतराने हा मुलगा बाेलू शकत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे घरच्यांना विश्वास वाटला की, कथनानुसार शहीद शंकर हाच आपल्या घरी जन्माला आला आहे. त्यामुळे त्याचे नाव शंकरराव असेच ठेवण्यात आल्याचे गजाननराव सांगतात.

पित्याला गाेळी लागली, पुत्र फासावर गेला

१९४२ च्या चले जाव आंदाेलनाचा निखारा नागपुरातही पडला हाेता. अनेक आंदाेलनकर्ते रस्त्यावर उतरले हाेते. त्यावेळी शहरात कर्फ्यू लावण्यात आला हाेता. दमनकारी इंग्रजांनी अनेक आंदाेलकांवर गाेळीबार केला. अशाच एका आंदाेलनात शंकर महाले यांचे वडील दाजिबा यांना शुक्रवारी तलावाजवळ गाेळी लागली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शंकर हाही आंदाेलनात उतरला हाेता. या तरुणांनी नवाबपुरा येथील पाेलीस चाैकी जाळली आणि येथील एका जमादाराला मारले. इंग्रजांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांचे वय अवघे १६ वर्षे हाेते. तेव्हा १७ पेक्षा कमी वयाच्या मुलाला फाशी देता येत नव्हती. हा खटला वर्षभर चालला आणि १९ जानेवारी १९४३ राेजी वयाच्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. त्यावेळी ‘वडील गाेळीने गेले, पुत्र फासावर लटकला’, अशी म्हण प्रचलित झाली हाेती.

सुनेचा मुलीप्रमाणे विवाह लावला

इंग्रजांनी तुरुंगात डांबले तेव्हा जेमतेम चार महिन्यांपूर्वी शंकर महाले यांचा शेवंताबाई यांच्याशी विवाह झाला हाेता. त्यांचे वय जेमतेम १३ वर्षे हाेते. त्यामुळे या निरागस मुलीचे आयुष्य उजाड होण्यापेक्षा विवाह करावा, असा प्रस्ताव चुलत सासरे माेरबाजी यांनी घरी ठेवला. समाजाचा विराेध हाेता; पण कुटुंबाचे एकमत झाले. शंकर महाले शहीद झाल्याच्या वर्षभरानंतर माेरबाजी यांनी सुनेचा मुलीप्रमाणे विवाह लावून दिला. चार वर्षांपूर्वी नुकतेच शेवंताबाई यांचेही निधन झाल्याचे गजाननराव यांनी सांगितले.

पं. नेहरूंच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन

स्वातंत्र्यानंतर महाल परिसरात शहीद शंकर महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक तयार करण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते झाले हाेते. त्यावेळी त्यांच्यासाेबत लहान असलेल्या इंदिरा गांधी यादेखील आल्याची आठवण गजाननराव यांनी सांगितली.

टॅग्स :historyइतिहास