शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राममधून मिळेल देशाला नवी दिशा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:08 IST

१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही देशभरात करणार आहोत. सेवाग्राममधूनच देशासोबतच काँग्रेस पक्षालादेखील भविष्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. सेवाग्राम येथे गांधीजयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची ऐतिहासिक बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देगांधीविचारांचा जागर देशभरात करणार

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही देशभरात करणार आहोत. सेवाग्राममधूनच देशासोबतच काँग्रेस पक्षालादेखील भविष्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. सेवाग्राम येथे गांधीजयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची ऐतिहासिक बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.काँग्रेसने नेहमी महात्मा गांधी यांच्या विचारधारेला आदर्श मानून काम केले आहे. आज भाजपा व संघाचे लोक इतिहासातील तथ्यांवर आघात करून देशाला एका वेगळ््या वाटेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील सध्याचे चित्र पाहता देशातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करणे व समाजकारणाची पुढील दिशा ठरविणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच ‘संपुआ’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत चिंतन व मनन करणार आहे. यातूनच येणारे सार हे सर्वांना दिशादर्शक ठरणारे असेल, असे अशोक चव्हाण म्हणाले. महात्मा गांधी हे केवळ काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. त्यांच्या विचारांचा जागर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राममधून याची सुरुवात करणे यासारखा दुसरा चांगला मुहूर्त राहूच शकत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.हा निवडणुकांचा शंखनाद नाही२०१९ च्या निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात सेवाग्राममधून करण्यात येत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मात्र सेवाग्राम येथे चिंतन व मनन करण्याची आमची भूमिका राजकीय नाही. एक पक्ष म्हणून देशातील समाजकारणावर येथे चर्चा होणार आहे. महात्मा गांधी यांना नमन करण्यात येणार आहे. हा निवडणुकांचा शंखनाद आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. मात्र देशातील अराजकता, भय आणि एकाधिकारशाहीच्या वातावरणाविरोधात समाजाच्या साथीने होत असलेला शंखनाद नक्कीच ठरेल, अशी स्पष्टोक्ती अशोक चव्हाण यांनी केली.शांती व सद्भावनेवर चर्चा होणारराजकीय पातळीवर एक महत्त्वाचा विरोधी पक्ष म्हणून आमची सरकारविरोधात निश्चित भूमिका आहेच, मात्र सेवाग्राम येथील भूमीत राजकारण करणे योग्य होणार नाही. देशात शांती व सद्भावना प्रस्थावित यावी यासाठी त्यासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. सेवाग्रामच्या भूमीतून काँग्रेस नवीन ऊर्जा घेऊन देशभरात नव्या जोमाने कामाला लागेल, असा दावादेखील त्यांनी केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस