शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

तलाव शुद्धीकरणासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST

दिनकर ठवळे लाेकमत न्यूज नेटवर्क कोराडी : केंद्र सरकारच्या तलाव शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत कोराडी येथील ४०० एकर जमिनीवर विस्तारलेला औष्णिक ...

दिनकर ठवळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोराडी : केंद्र सरकारच्या तलाव शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत कोराडी येथील ४०० एकर जमिनीवर विस्तारलेला औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरविणारा कोराडी येथील जलसंग्रहण तलावातील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोराडी तलावात ज्या-ज्या भागांतून सांडपाणी सोडले जाते, अशा सर्व ठिकाणी सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, शेवटच्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.

केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाच्या ४० टक्के वाट्यातून राबविण्यात येणाऱ्या या योजनांचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. या प्रकल्पाची किंमत ४१ कोटी रुपये असून, या अंतर्गत कोराडी तलावाच्या पाच दिशेने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात आले आहेत. यातील कोराडी मंदिर परिसरातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने हा प्रकल्प कार्यान्वित होण्यास सज्ज आहे, तसेच इतर तीन ठिकाणांच्या प्रकल्पांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. लॉकडाऊनमुळे यंत्रसामुग्री येण्यात काही अडचणी असल्यामुळे त्याला विलंब होत आहे. पाचव्या सीटीपीचे काम काही दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आले आहे. सहावी सीटीपी गरज नसल्याने रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व सीटीपी कार्यान्वित झाल्यावर, कोराडी तलावाला दूषित पाण्यापासून वाचविता येईल.

...

गांडूळ खतनिर्मिती

या तलावातून काढण्यात येणाऱ्या गाळ व कचऱ्यावर प्रक्रिया करून, त्यापासून गांडूळ खतनिर्मिती करण्यासाठी कोराडी देवी मंदिर परिसराच्या सुरादेवीकडच्या दिशेने दहा हजार वर्गफूट जागेत २१ लाख रुपये किमतीचा गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, हस्तांतराची प्रतीक्षा आहे. तलावाच्या शुद्धीकरण योजनेंतर्गत केंद्राचा ६० टक्के वाटा असून, राज्याचा ४० टक्के वाटा आहे. राज्य शासनाच्या वतीने महानिर्मितीने हा ४० टक्के वाटा उचलला आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या सहकार्याने या तलावाचे शुद्धीकरण करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हे सर्व काम करण्यासाठी शासनाच्या वतीने नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाला एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे.

...

निधी प्राप्त हाेण्याचा घाेळ

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नियोजित काळापेक्षा उशिराने पूर्ण होत आहेत. यासाठी कोरोना संसर्ग व लाॅकडाऊनची अडचण असली, तरी निधीचीही अडचण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या वतीने राज्य सरकारला २२ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केंद्र शासनाच्या या २२ कोटींच्या निधीपैकी बराच निधी अजूनही राज्य शासनाकडे पडून आहे. राज्य शासनाचा ४० टक्के वाटा महानिर्मितीने उचलला आहे. त्यातही आर्थिक अडचण येत आहे. केंद्राने दिलेल्या २२ टक्के निधी हा तरी राज्य शासनाने या प्रकल्पासाठी वेळेवर द्यावा, जेणेकरून हे प्रकल्प रखडणार नाहीत, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.