शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उपराजधानीत सातवे अ. भा. जलसाहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:38 IST

पाण्यासंदर्भातील प्रश्न साहित्यिकांमार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला पाणी मंच नागपूर आणि आकांक्षा मासिकाच्या सहकार्याने २० आणि २१ आॅक्टोबरला अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती अरुणा सबाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअरुणा सबाने यांची माहिती : पाणी प्रश्नाला लोकचळवळीचे स्वरुप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्यासंदर्भातील प्रश्न साहित्यिकांमार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला पाणी मंच नागपूर आणि आकांक्षा मासिकाच्या सहकार्याने २० आणि २१ आॅक्टोबरला अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती अरुणा सबाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.संमेलनाचे उद्घाटन २० आॅक्टोबरला सकाळी १०.३० वाजता भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते होईल. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, अतुल देऊळगावकर, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. वसंत पुरके यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी नीरक्षीर या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते होईल. दुपारी १ वाजता जल आणि संत साहित्य, ३ वाजता अर्थशास्त्र आणि जलउपलब्धी यावर परिसंवाद, सायंकाळी ५ वाजता अभिजित घोरपडे यांची मुलाखत होईल. २१ आॅक्टोबरला सकाळी ९.३० वाजता अनुभवकथन, ११ वाजता जल आणि लोकसाहित्य, दुपारी १ वाजता कविसंमेलन होईल. ३ वाजता संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती अरुणा सबाने यांनी दिली. पत्रकार परिषदेला अमिताभ पावडे, डॉ. वंदना महात्मे, डॉ. प्रमोद मुनघाटे, समीक्षा शर्मा, वंदना बनकर उपस्थित होत्या.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर