शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:46 IST

जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

ठळक मुद्देशाळेत दिला शिक्षकांना चकमा : प्रशासनाची तारांबळ, तब्बल २४ तासानंतर पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.जरीपटक्यातील पाटणकर चौकात शासकीय मुलांचे निरीक्षणगृह आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या बालगुन्हेगारांना तसेच घरून निघून आलेल्या आणि कोणताही आधार नसलेल्या, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना येथे ठेवले जाते. त्यांच्या जेवण, निवास आणि शिक्षणाचा खर्च शासनाच्या निधीतून केला जातो. अशाचपैकी येथे असलेल्या शाळकरी मुलांपैकी बेनामी संजुपाल यादव, कार्तिक दिलीप भास्कर (१७), शहिद बलबीर नाडे (वय १७), प्रशांत प्रल्हाद नेवारे (वय १७), राजाराम भालचंद्र उईके (वय १६), मोहम्मद नियाज हुसेन चिस्ती (वय १५) आणि परमेश्वर बाबूराव ढगे (वय १४) ही मुले शनिवारी सकाळी निरीक्षणगृहातून शाळेत जायला निघाले. ती सर्व कामठी मार्गावरील शेंडेनगरात असलेल्या समता विद्यालयात शिकतात. शाळेत पोहोचल्यानंतर ९ ते ९.३० या वेळेत शिक्षकांची नजर चुकवून ती मुले शाळेतून पळून गेली. ही बाब लक्षात आल्याने शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली. इकडे-तिकडे विचारणा केल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी निरीक्षणगृह प्रशासनाला त्याची माहिती कळविली. बराच वेळ विचारविमर्श केल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाने जरीपटका पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी शाळा गाठून चौकशी केली. त्यानंतर या मुलांना शोधण्यासाठी शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर मुले हाती लागली नाही.अक्षम्य हलगर्जीपणाजरीपटक्यातील या निरीक्षणगृहाचे प्रशासन नेहमीच हलगर्जीपणासाठी चर्चेला येते. येथून यापूर्वीही अनेक मुले पळाली आहेत. वर्षभरात अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे. दरम्यान, या घटनेची लेखी तक्रार नम्रता राजू चौधरी (वय ५२) यांनी निरीक्षणगृह प्रशासनातर्फे तब्बल २४ तासानंतर जरीपटका ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मिश्रा यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पळून गेलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर