शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:46 IST

जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

ठळक मुद्देशाळेत दिला शिक्षकांना चकमा : प्रशासनाची तारांबळ, तब्बल २४ तासानंतर पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.जरीपटक्यातील पाटणकर चौकात शासकीय मुलांचे निरीक्षणगृह आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या बालगुन्हेगारांना तसेच घरून निघून आलेल्या आणि कोणताही आधार नसलेल्या, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना येथे ठेवले जाते. त्यांच्या जेवण, निवास आणि शिक्षणाचा खर्च शासनाच्या निधीतून केला जातो. अशाचपैकी येथे असलेल्या शाळकरी मुलांपैकी बेनामी संजुपाल यादव, कार्तिक दिलीप भास्कर (१७), शहिद बलबीर नाडे (वय १७), प्रशांत प्रल्हाद नेवारे (वय १७), राजाराम भालचंद्र उईके (वय १६), मोहम्मद नियाज हुसेन चिस्ती (वय १५) आणि परमेश्वर बाबूराव ढगे (वय १४) ही मुले शनिवारी सकाळी निरीक्षणगृहातून शाळेत जायला निघाले. ती सर्व कामठी मार्गावरील शेंडेनगरात असलेल्या समता विद्यालयात शिकतात. शाळेत पोहोचल्यानंतर ९ ते ९.३० या वेळेत शिक्षकांची नजर चुकवून ती मुले शाळेतून पळून गेली. ही बाब लक्षात आल्याने शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली. इकडे-तिकडे विचारणा केल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी निरीक्षणगृह प्रशासनाला त्याची माहिती कळविली. बराच वेळ विचारविमर्श केल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाने जरीपटका पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी शाळा गाठून चौकशी केली. त्यानंतर या मुलांना शोधण्यासाठी शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर मुले हाती लागली नाही.अक्षम्य हलगर्जीपणाजरीपटक्यातील या निरीक्षणगृहाचे प्रशासन नेहमीच हलगर्जीपणासाठी चर्चेला येते. येथून यापूर्वीही अनेक मुले पळाली आहेत. वर्षभरात अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे. दरम्यान, या घटनेची लेखी तक्रार नम्रता राजू चौधरी (वय ५२) यांनी निरीक्षणगृह प्रशासनातर्फे तब्बल २४ तासानंतर जरीपटका ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मिश्रा यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पळून गेलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर