शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सत्र संपले पण येथील शाळांमध्ये विज्ञान, गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 21:07 IST

जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची चिंता पालकांनाही आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषद शाळांतील वास्तव : दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची चिंता पालकांनाही आहे.जिल्हा परिषदेद्वारे संचालित माध्यमिक विभागाच्या १६ शाळा आहेत. येथे वर्ग ५ ते १० पर्यंत शिक्षण देण्यात येते. या १६ शाळांमध्ये १५०० च्या जवळपास विद्यार्थ्यांची संख्या आहे. २०० च्या जवळपास दहावीचे विद्यार्थी आहेत. पण या १६ शाळांमध्ये काही शाळेत शिक्षक अतिरिक्त आहेत. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलजवळीची शाळा दहाव्या वर्गापर्यंत आहे. १५४ पटसंख्या असलेल्या या शाळेत ९ शिक्षक मंजूर आहेत. या शाळेत दहावीचे ३० विद्यार्थी आहेत. पण या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर गणित आणि विज्ञान शिकविणारे शिक्षकच मिळाले नाहीत. नांद येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतही दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचा शिक्षक मिळालेला नाही. विज्ञान आणि गणितासारखे महत्वाच्या विषयाला शिक्षक मिळत नसतील तर शाळेचे निकाल काय लागतील हा प्रश्नच आहे. शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये १६ विद्यार्थी आहे आणि शिक्षकांची संख्या ८ आहे. येथे शिक्षक अतिरिक्त असतानाही त्यांचे सत्र संपेपर्यंत समायोजन का झाले नाही, हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती खुद्द जि.प.चे उपाध्यक्ष यांनी अनुभवली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर याचे खापर फोडले. 

प्रशासनाचे दुर्लक्ष का?बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा असते. अशा महत्वाच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांना शासनाच्या शाळेतच शिक्षक मिळत नसेल तर शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारात ठेवण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचे भावना स्थानिक रहिवासी बाळू इंगोले यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकscienceविज्ञानzp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर