शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ज्याच्यावर दाखवला विश्वास त्यानेच केला घात; १५ लाखांची रोकड घेऊन नोकर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 16:53 IST

सागर यांना संशय आला व त्यांनी तिजोरी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना धक्का बसला.

ठळक मुद्देइतवारी अनाज बाजारातील घटना, अखेर आरोपीला अटक

नागपूर : मालकाने विश्वास ठेवून दुकानातील नोकराजवळ तिजोरीची चाबी दिली आणि नोकरानेच विश्वासघात केल्याचा प्रकार इतवारीत घडला आहे. दुकानातील तिजोरीतील १५ लाखांची रक्कम लंपास केली व मोबाईल बंद करून नोकर पळून गेला. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली व आरोपीला अटक केली. गोविंद रघुवीर मानकर (२२, गुलशननगर) असे नोकराचे नाव आहे.

सागर विजय कृष्णानी (२६, छापरूनगर) यांचे इतवारी अनाज बाजार येथे एस.के.ट्रेडर्स व क्रिष्णा पूजा ट्रेडर्स ही दुकाने आहेत. ६ जून रोजी त्यांनी दुकानातील नोकर असलेल्या गोविंदला दुपारी साडेचारच्या सुमारास १५ लाख रुपयांची रोकड दिली व ती तिजोरीत ठेवायला सांगितली. तिजोरीची चाबी गोविंदकडेच दिली व ते जेवायला निघून गेले. सायंकाळी सात वाजता दुकानात परत आल्यावर तेथे गोविंद नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला फोन लावला. मात्र त्याचा फोन बंद होता.

सागर यांना संशय आला व त्यांनी तिजोरी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण त्यात पैसेच नव्हते. सागर यांनी तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. या घटनेमुळे अनाज बाजारात खळबळ उडाली. पोलिसांनी सखोल तपास केला व आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात आणखी कुणी सहभागी होत का याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर