शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल : विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:49 IST

राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.

ठळक मुद्देआरोपी वाहनचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.पृथ्वीराज मनोहर जाधव (वय २१, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, रघुजीनगर) आणि सुशांत सुभाष नागदेवते (वय २५, रा. आदिवासी कॉलनी) तसेच शुभम गुणवंतराव वाघ (वय २०, रा. आदिवासी कॉलनी) हे तीन मित्र रविवारी रामटेकला गेले होते. तेथील मित्रांसोबत गडमंदिर दर्शन आणि दिवसभर गंमतजंमत केल्यानंतर रात्री त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने रामटेकवरून नागपुरात परत येत होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर मार्गावरील शेंद्रे ढाब्यासमोर चुकीच्या दिशेने वेगात जेसीबी (एमएच ३४/ एल ६६७९) चालविणाऱ्या आरोपी शाहू याने सुशांतच्या हॉरनेट स्पोर्ट बाईक (एमएच ४९/एएक्स ३२९५)ला जोरदार धडक मारली. त्यामुळे स्पोर्ट बाईक चक्काचूर झाली आणि पृथ्वीराज तसेच सुशांतचा करुण अंत झाला तर शुभम गंभीर जखमी झाला होता. या अपघात प्रकरणात कळमना पोलिसांनी शिवराज रणजित जाधव (वय २४, रा. वकीलपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जेसीबी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आरोपीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. जेसीबीसारखे अवजड वाहन आरोपी शाहू राँग साईड (चुकीच्या बाजूने) चालवित होता. त्यात अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात तो जेसीबी चालवित होता. त्याच्या निष्काळजीपणामुळेच दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी कळमना पोलिसांना आरोपी शाहूविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कळमना पोलिसांनी आरोपी शाहूविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ तसेच ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.यापुढे असेच होणारनिष्काळजीपणे वाहन चालवून निर्दोष व्यक्तीचा बळी घेणारे वाहनचालक सुसाट वेगाने पळून जातात. पोलिसांच्या हाती लागले तरी अपघाताच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे बेदरकार वाहनचालक निर्ढावतात. त्यांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यामुळे तो वारंवार अपघात घडवतो. या घडामोडीमुळे मात्र बेदरकार वाहनचालकांवर अंकुश बसण्याची आशा निर्माण झाली आहे. यापुढे राँग साईड वाहन चालवून कुणाचा बळी घेणाऱ्या आरोपी वाहनचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यात आरोपीला तातडीने जामीनही मिळत नाही.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयAccidentअपघात