शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

२९ सप्टेंबरची यशस्वी प्रवेश चाचणी रद्द; एनटीएचा सावळा गाेंधळ, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड

By निशांत वानखेडे | Updated: September 27, 2023 18:29 IST

२२ ला परीक्षेची जाहिरात, २६ ला रद्दचे पत्रक

निशांत वानखेडे

नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे ओबीसी, ईबीसी व डिएनटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी २९ सप्टेंबरला होणारी ‘यशस्वी प्रवेश चाचणी’ अचानक रद्द करण्याची घोषणा नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) ने बुधवारी पत्रकाद्वारे केली. विशेष म्हणजे २२ सप्टेंबरला परीक्षेची जाहिरात देण्यात आली आणि चार दिवसात २६ सप्टेंबरला परीक्षा रद्द करण्याचे पत्रक काढण्यात आले. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे इतर मागासवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्टी मागास (ईबीसी) व डिएनटीच्या ईयत्ता ९ व १० आणि ईयत्ता ११ व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘यंग अचिव्हर्स अवार्ड स्कॉलरशीप’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी ईयत्ता ८ वी आणि ईयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी एन्ट्रंस टेस्ट’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. एनटीएद्वारे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९ व १० वीत प्रतिवर्षी ७५ हजार आणि ११ व १२ वीच्या पात्र विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. हीच प्रवेश परीक्षा २९ सप्टेंबरला होणार होती व २२ सप्टेंबरला तसे पत्रक काढण्यात आले. मात्र चारच दिवसात पुन्हा परीक्षा रद्द करण्याचे पत्रक एनटीएने काढले आहे. त्यामुळे एनटीएचा काय सावळा गोंधळ चालला आहे, असा सवाल शाळांकडून केला जात आहे.

विद्यार्थ्यांवर दडपण नको म्हणून

एनटीएच्या पत्रकानुसार यशस्वी प्रवेश परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांच्या ८ वी व १० वीच्या गुणांच्या आधारावरच ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ६० टक्क्यांच्यावर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर नॅशनल स्कॉलरशीप पाेर्टलवरून विद्यार्थ्यांची निवड होईल, असे पत्रकात नमूद आहे. विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचे दडपण नको म्हणून ही परीक्षा रद्द केल्याचे सुत्रांनी सांगितले.

याआधीही दोन योजनेचा परीक्षा बंद

केंद्र सरकारने यापूर्वी अशाचप्रकारे नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) परीक्षा व किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना सुरू केली होती. मात्र दोन वर्षापूर्वी या दोन्ही योजना बंद झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता ही तिसरी योजना बंद करण्याचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

आमच्या शाळेत १८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते व त्यांनी कसून तयारी केली हाेती. मात्र अचानक ही परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर दडपण येत असल्याचे कारण दिले जाते, तर मग परीक्षाच कशाला जाहीर केली? काय करावे याबाबत सरकार स्वत:च संभ्रमात असल्याचे दिसते.

- सैयद मकसूद पटेल, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल, यवतमाळ

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाScholarshipशिष्यवृत्तीnagpurनागपूर