शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:21 IST

सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे.

ठळक मुद्दे‘तेजस’ मॉडेल होणार साकार : रेल्वे करीत आहे गांभीर्याने विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे. ही संकल्पना खरेच मूर्त रुपात आली तर महामार्ग आणि रेल्वे ट्रॅक यांच्यात भरधाव वेगाची स्पर्धा राहील.समृद्धी महामार्ग राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत नागपूर ते मुंबई दरम्यान रस्ता मार्गाने लागणारा वेळ हा १५ तासाहून ८ तासावर येईल. समृद्धी महामार्ग प्रल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. ७०१ किमीच्या या महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यात चार-चार लेनचे दोन मार्ग राहतील. आता रेल्वे विभाग यावर असा विचार करीत आहे की, या महामार्गाच्या समानांतर हायस्पीड रेल्वे चालवण्यात यावी. रेल्वेतील सूत्रांचा असा दावा आहे की, यासाठी जागेची उपलब्धता तपासून पाहिली जात आहे. वेगळा ट्रॅक टाकून हायस्पीड रेल्वे चालवण्याबाबत विचार केला जात आहे. या रेल्वे गाडीची गती प्रति तास २०० कि.मी. इतकी राहील. अशा परिस्थितीत नागपूर ते मुंबईचे अंतर चार तासात पूर्ण होईल. सूत्रांनुसार या रेल्वेचे संचालन लखनौते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या ‘तेजस’ रेल्वेच्या धर्तीवर खासगी तत्त्वावर चालवण्याचा विचार केला जात आहे. हा विचार सध्या प्राथमिक स्तरावर आहे. व्यावहारिक बाजू तपासल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.काय आहे तेजस?तेजस एक्स्प्रेस लखनौ ते दिल्ली दरम्यान चालणारी हायस्पीड रेल्वेगाडी आहे. ही देशातील पहिली रेल्वे आहे ज्याचे संचालन खासगी हातात सोपवण्यात आले आहे. आठवड्यात सहा दिवस चालणाऱ्या या रेल्वेची जबाबदारी आयआरसीटीसीवर आहे. २०० कि.मी. प्रति सात याप्रमाणे धावणारी ही गाडी केवळ ६.१५ तासात आपला प्रवास पूर्ण करते. ही गाडी केवळ कानपूर आणि गाजियाबाद येथेच थांबते.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग