शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या झिरो माईलला बनविणार ‘सेल्फी पॉर्इंट’ : जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:40 IST

शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, एमटीडीसीचे प्रधान सचिव नितीन गद्रे, व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते बोदलकसा पर्यटन प्रकल्प, वणी येथील माईन टुरिझमचे लोकार्पण करण्यात आले. मदन येरावार म्हणाले, देशात व विदेशातही अनेक राज्यांनी पर्यटनाच्या आधारे आपली अर्थव्यवस्था समृद्ध केली आहे. पर्यटनात आर्थिक चित्र बदलण्याची क्षमता आहे. एमटीडीसीचे विश्रामगृह हे पर्यटकांची पहिली पसंती असावी, असा आमचा प्रयत्न आहे. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा उपक्रम अभिनंदनीय आहे. यासाठी नागपूर मनपातर्फे आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू. प्रास्ताविक डॉ. उदय बोधनकर, सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानची ओळख ज्योत्स्ना पंडित तर संचालन वृशाली देशपांडे यांनी केले. उद्घाटनानंतर सुरमयी शाम या गायक सावनी रवींद्र आणि कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंगनागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंग केले. येथील संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासोबतच पर्यटनाला वाव मिळावा म्हणून आम्ही हा फेस्टिव्हल आयोजित केला होता. तो प्रचंड यशस्वी झाला. त्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या  काळात आपल्याला दिसतील, असा विश्वासही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर