शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपूरच्या झिरो माईलला बनविणार ‘सेल्फी पॉर्इंट’ : जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:40 IST

शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, एमटीडीसीचे प्रधान सचिव नितीन गद्रे, व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते बोदलकसा पर्यटन प्रकल्प, वणी येथील माईन टुरिझमचे लोकार्पण करण्यात आले. मदन येरावार म्हणाले, देशात व विदेशातही अनेक राज्यांनी पर्यटनाच्या आधारे आपली अर्थव्यवस्था समृद्ध केली आहे. पर्यटनात आर्थिक चित्र बदलण्याची क्षमता आहे. एमटीडीसीचे विश्रामगृह हे पर्यटकांची पहिली पसंती असावी, असा आमचा प्रयत्न आहे. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा उपक्रम अभिनंदनीय आहे. यासाठी नागपूर मनपातर्फे आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू. प्रास्ताविक डॉ. उदय बोधनकर, सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानची ओळख ज्योत्स्ना पंडित तर संचालन वृशाली देशपांडे यांनी केले. उद्घाटनानंतर सुरमयी शाम या गायक सावनी रवींद्र आणि कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंगनागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंग केले. येथील संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासोबतच पर्यटनाला वाव मिळावा म्हणून आम्ही हा फेस्टिव्हल आयोजित केला होता. तो प्रचंड यशस्वी झाला. त्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या  काळात आपल्याला दिसतील, असा विश्वासही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर