शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्ह्यातील ५० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 09:00 IST

Nagpur News स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना दिले प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावातील रोगराई दूर करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२०-२१ च्या वार्षिक कृती आराखड्यात जिल्ह्यातील एकूण ७६८ ग्रामपंचायतींमधील ५० गावांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या गावांची निवडही शासनाकडून करण्यात आली असून, या उपक्रमाअंतर्गत पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या गावात घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६० रुपये, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पाच हजारावरील लोकसंख्येच्या गावामध्ये घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये, तर सांडपाण्यासाठी ६६० रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) अनिल किटे यांनी पुढाकार घेतला आहे.

ही कामे होणार...

सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंबस्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी विषय असणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोष्ट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचरा कुंड्या देणे, सार्वजनिक कचरा कुंड्या बसवणे, कुटुंबस्तरावर कंपोष्ट खत निर्मिती करणे, गावस्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोष्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी कामे आहेत.

या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी सांगितले.

निवड झालेली गावे...

नागपूर : सोनेगाव निपानी, चिकना, लिंगा, बाजारगाव

भिवापूर: नक्क्षी, नांद, तास, बेसूर

हिंगणा : अडेगाव, कोतेवाडा, मंगरुळ व सुकळी

कळमेश्वर : बोरगाव, घोराड, लिंगा, पारडी (देश.)

काटोल : कचारी सावंगा, डिग्रस, रिधोरा, सोनोली

कुही : पचखेडी, तरण, वाग, मौद्यातील धरमपूर, कोदामेंढी, माथनी, मोहाडी

कामठी : बिना, गडा, खापा, नेरी

नरखेड : लोहारीसावंगा, रोहणा, रामधी

पारशिवनी : जुनी कामठी, नयकुंड, पालोरा, तामसवाडी

सावनेर : चिचोली (खा.), चनकापूर, इसापूर व वाकोडी

रामटेक : मांदरी, पंचला, पिंडकापार

उमरेड : सिर्सी, वायगाव, हिवरा व पिपरी

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान