शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्ह्यातील ५० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 09:00 IST

Nagpur News स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना दिले प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावातील रोगराई दूर करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२०-२१ च्या वार्षिक कृती आराखड्यात जिल्ह्यातील एकूण ७६८ ग्रामपंचायतींमधील ५० गावांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या गावांची निवडही शासनाकडून करण्यात आली असून, या उपक्रमाअंतर्गत पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या गावात घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६० रुपये, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पाच हजारावरील लोकसंख्येच्या गावामध्ये घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये, तर सांडपाण्यासाठी ६६० रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) अनिल किटे यांनी पुढाकार घेतला आहे.

ही कामे होणार...

सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंबस्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी विषय असणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोष्ट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचरा कुंड्या देणे, सार्वजनिक कचरा कुंड्या बसवणे, कुटुंबस्तरावर कंपोष्ट खत निर्मिती करणे, गावस्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोष्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी कामे आहेत.

या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी सांगितले.

निवड झालेली गावे...

नागपूर : सोनेगाव निपानी, चिकना, लिंगा, बाजारगाव

भिवापूर: नक्क्षी, नांद, तास, बेसूर

हिंगणा : अडेगाव, कोतेवाडा, मंगरुळ व सुकळी

कळमेश्वर : बोरगाव, घोराड, लिंगा, पारडी (देश.)

काटोल : कचारी सावंगा, डिग्रस, रिधोरा, सोनोली

कुही : पचखेडी, तरण, वाग, मौद्यातील धरमपूर, कोदामेंढी, माथनी, मोहाडी

कामठी : बिना, गडा, खापा, नेरी

नरखेड : लोहारीसावंगा, रोहणा, रामधी

पारशिवनी : जुनी कामठी, नयकुंड, पालोरा, तामसवाडी

सावनेर : चिचोली (खा.), चनकापूर, इसापूर व वाकोडी

रामटेक : मांदरी, पंचला, पिंडकापार

उमरेड : सिर्सी, वायगाव, हिवरा व पिपरी

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान