शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

मृत तरुणींची उपेक्षा, अवहेलना बघून निसर्गही गलबलला, हमसून हमसून रडला !

By नरेश डोंगरे | Updated: June 14, 2024 22:41 IST

नियती किती भयानक पद्धतीने सूड उगविते, त्याचा आज प्रत्यय आला अन् माणसंच नव्हे तर निसर्गही गलबलला, हमसून हमसून रडला.

नागपूर : जिवंतपणी गरिबीचे चटके अन् अनेकांकडून उपेक्षा, अवहेलना सहन करणाऱ्या 'त्या' बिचाऱ्यांना अत्यंत वेदनादायी मृत्यू मिळाला. मृत्यूनंतर माणसाची सर्व कटकटीपासून, मान-अपमानापासून सुटका होते, असे म्हणतात. मात्र, भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 'त्या' पाच जणींना मृत्युनंतरही उपेक्षा अन् अवहेलनाच सहन करावी लागली. नियती किती भयानक पद्धतीने सूड उगविते, त्याचा आज प्रत्यय आला अन् माणसंच नव्हे तर निसर्गही गलबलला, हमसून हमसून रडला.

धामना लिंगा या छोट्याशा खेडेगावातील प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्रांजली किसनाजी मोंदरे (वय २२), मोनाली शंकरराव अलोने (२५) या चार तरुणी आणि शीतल आशिष चटप (३०) ही एका चिमुकलीची आई ! पाचही जणी गरिबीचा शाप घेऊन जन्माला आल्या. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करून जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्यांनी स्वत:सोबतच कुटुंबियांचेही जगणे सुसह्य व्हावे म्हणून मिळेल ते कष्ट करण्याची तयारी चालविली. दरदिवशी त्या परिस्थितीचे चटके आणि उपेक्षा, अवहेलनाही सहन करीत होत्या. गुरुवारी, १३ जूनला भीषण स्फोटाने त्यांच्या शरिराची अवस्था फारच वाईट केली.

उपचार मिळेल म्हणून मरणयातना सहन करीत त्या खूप वेळपर्यंत प्रतिक्षा करीत होत्या. मात्र, त्यांना उपेक्षाच वाट्याला आली. शेवटी त्यांनी जीव सोडला. मृत्युनंतर साऱ्याच दु:ख, वेदनातून सुटका होत असल्याचे लोक म्हणतात. मात्र, कसले काय. शुक्रवारी १४ जूनला प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांचे मृतदेह दुपारी २.३० च्या सुमारास गावाच्या वेशिवर पोहचले. तोपर्यंत स्फोटाची घटना घडून सुमारे २६ तासांचा वेळ झाला होता. मृतदेहाची स्थिती बघता त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. मात्र, गुरुवारी दुपारपासून शुक्रवार दुपारपर्यंत कंपनी प्रशासन आणि शासकीय यंत्रणांची एकूणच तटस्थ भूमीका लक्षात घेऊन गावकऱ्यांना भलतीच शंका आली. एकदा अंत्यसंस्कार केले की प्रशासनातील मंडळी मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार नाही, त्यांना हेलपाटे मारायला लावले जाईल, असे त्यांना वाटले. त्यामुळे आधी मदतीचा धनादेश द्या, नंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करू, अशी भूमीका शोकविव्हळ गावकऱ्यांनी घेतली. त्यावेळीपर्यंत नेहमीसारखी प्रशासकीय यंत्रणा मख्ख होती. ही मागणी पुढे आल्याने त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २.३० वाजतापासून वेगवेगळे कारण सांगून मदतीचे धनादेश आता येईल, नंतर येईल, असे सांगितले जाऊ लागले. नागपूरहून धनादेश येणार म्हणजे, जास्तीत जास्त अर्धा किंवा एक तास लागेल, असे वाटत होते.

परंतू, अडीच तीन तास होऊनही मदतीचे धनादेश पोहचलेच नव्हते. ईकडे नागरिकांच्या, बायाबापड्यांच्या भावनांचे आभाळ भरून आले होते. मृतदेह किती वेळ तसेच ताटकळत ठेवायचे, असे विचारत अनेक जण अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. तिकडे तरुण मंडळींचे पेशन्स संपल्याने ते रस्ता रोको, घोषणाबाजी करून आक्रमक होत होते. मात्र, निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणा वेळ काढण्यातच जास्त स्वारस्य दाखवित होती. कोणत्याही संवेदनशिल मनात उद्रेक निर्माण करणाराच हा प्रकार होता. कदाचित निसर्गाला त्या बिचाऱ्या प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांची मृत्युनंतरही होणारी अवहेलना सहन झाली नसावी. त्यामुळे तोही गललबला असावा. म्हणूनच की काय, अचानक टपोऱ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. थोड्या-थोड्या वेळाने हुंदके भरून यावे अन् अश्रूंचा बांध फुटावा, तसा पाऊस येऊ लागला. विशेष म्हणजे, सर्वत्र नव्हे तर धामन्याच्या आजुबाजूच्या परिसरातच हा पाऊस पडला. त्या बिचाऱ्यांच्या यातनांवर निसर्ग हमसून हमसून रडल्यासारखाच हा प्रकार होता.

शोकविव्हळ मनावर फुंकर

सायंकाळी साडेसहाच्या सुुमारास भर पावसात मृतांच्या कुटुंबियांसाठी घटनास्थळी एका अधिकाऱ्याच्या वाहनात मदतीचे धनादेश तयार करण्यात आले. त्यांच्या शोकविव्हळ मनावर मदतीची फूंकर घालण्यात आली. त्यानंतर जड अंतकरणाने प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांना निरोप देण्यात आला.