शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांची धुमश्चक्री; नक्षलग्रस्त भागात थ्रेट

By नरेश डोंगरे | Updated: November 4, 2023 22:50 IST

खबरदारीच्या विविध उपाययोजना; सुरक्षा यंत्रणा सज्ज

नागपूर : मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका त्यातच नक्षलग्रस्त भागात मिळालेला थ्रेट लक्षात घेता या मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान नागपूर-विदर्भातील सुरक्षा यंत्रणांनी स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारची खबरदारी घेत पोलिस पुढचे ४८ तास अविश्रांत कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्या तरी सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते प्रचंड हिरिरीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवतात. साम-दाम-दंड-भेद या सर्वच धोरणाचा वापर केला जातो. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एक वेगळीच स्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी विदर्भात ठिकठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे यावेळी निवडणुकांच्या बंदोबस्ताचे स्वरूपही बदलविण्यात आले आहे. विदर्भात सर्वाधिक राजकीय संवेदनशील जिल्हा म्हणून अर्थातच नागपूर जिल्ह्याचे नाव आहे.

माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विविध पक्षाचे आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार असे सर्वच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांशी जुळले असल्याने पोलिसांनी अत्यंत सतर्कपणे मतदान आणि नंतर निकालाच्या बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील ८०० पोलिस, बाहेरून आलेले १५ अधिकारी आणि २५० पोलिस कर्मचारी तसेच १०१८ होमगार्ड शुक्रवारी रात्रीपासून कर्तव्यावर लागले आहेत.

रविवारी मतदानाचा दिवस आणि त्यानंतर निकालाच्या रात्रीपर्यंत हे सर्व अविश्रांत कर्तव्य बजावणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त अधीक्षक संदीप पखाले आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बंदोबस्ताची मिनट टु मिनट रिपोर्टिंग घेत आहेत. निवडणुका असो की आणखी काही विदर्भात सर्वाधिक संवेदनशील म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे येते. या भागातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना थ्रेट आहे. त्यामुळे खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील आणि गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांसह त्यांचे सर्व सहकारी सुरक्षेच्या खास उपाययोजना करण्यात गुंतले आहेत.

एटापल्ली, फेंडरीकडे विशेष व्यवस्था

नक्षलग्रस्त भागातील एटापल्ली आणि फेंडरीसह सात ठिकाणी नक्षली उपद्रवाचे संकेत असल्याने त्या भागाला सुरक्षेचे खास कवच घालण्यात आले आहे. निर्धोकपणे या निवडणुका पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या अनुषंगाने नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख आणि गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. कोटगुल, पेंढरी, मुरुमगांव, राजाराम खंडला, देचालीपेटा, रेगुंठा, वेंकटपूर आणि मन्नेराजाराम आदी गावात ईव्हीएम तसेच पोलिंग पार्टी हेलिकॉप्टरने पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnagpurनागपूर