शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुसऱ्याच दिवशी ४,००० विद्यार्थी वाढले : आणखी १४ शिक्षक पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:26 IST

Students presenty increased

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून शाळेच्या भेटी सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : दहा महिन्यापासून बंद असलेल्या शाळा जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबरपासून सुरू केल्या. पहिल्याच दिवशी १६,१९८ विद्यार्थी अध्यापनासाठी शाळेच पोहोचले. पहिल्या दिवशी शाळेची झालेली यशस्वी सुरुवात लक्षात घेता, त्याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी घरी न थांबता शाळेत येण्याला पसंती दर्शविली. मंगळवारी शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यात २०,३१८ विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६४८ शाळा सोमवारी सुरू झाल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना शाळा व जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. शाळेने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पालकांची आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याला पसंती दर्शविली. जिल्ह्यात ९ वी ते १२ वी वर्गाचे १,२८,६८९ विद्यार्थी आहेत. दोन दिवसात विद्यार्थ्यांची संख्या चार हजाराने वाढली आहे. शिक्षण विभाग व शाळांच्या नियोजनामुळे लवकरच बहुतांश विद्यार्थी शाळेत परततील, असा विश्वास शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी काही शिक्षकांचे कोरोना अहवाल आले. यात १४ शिक्षक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कोरोना तपासणीत ६७ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असून, आतापर्यंत ५,१५८ शिक्षकांनी कोरोनाच्या टेस्ट केल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी